क्राईम

शिरूर -श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर झालेल्या निर्घुण खुणाची अद्याप उकल होईना…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर -श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी परीसरात एकाचा निर्घुण खून झाला असून यात एका तरुणाचे शीर धडा वेगळे ,दोन हात ,एक पाय तोडले. तर एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह (दि. १2) मार्च रोजी आळढून आल्याने शिरूर -श्रींगोदा तालुक्यात मोठी खळबळ माजली होती. या घटनेबाबत गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, शिरूर पोलीस स्टेशन ,तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन याबाबत सखोल समांतर तपास करून अनेक जणांची चौकशी करीत आहेत. परंतु अद्यापपर्यंत या खुणाबाबत कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याने पोलिसांपुढे मोठी डोकेदुखी वाढली आहे. हा निर्घृण खून कोणी व कशासाठी केला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून यातील आरोपींना शोधून काढणे जिकरीचे बनले आहे.

महाराष्ट्रसह अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले असून असा निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधमांना तात्काळ गजाआड करण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे. शिरूर तालुका व श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी ता. श्रीगोंदा या ठिकाणी 18 ते 22 वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह विहिरी मध्ये आढळून आला आहे. या मृत्यू देहाचे शीर, दोन हात ,व एक पाय नसल्याचे दिसून आले आहे. तर एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणाही आढळून आल्या आहे. हा मृतदेह शिरूर येथून दाणेवाडी ता. श्रीगोंदा येथील शिरूर येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

मिसिंगचे प्रमाण वाढले… 

शिरूर पोलीस स्टेशन येथे गेल्या दीड महिन्यापासून हरवलेच्या, पळून गेल्याच्या, पळून नेल्याच्या अशा एकुण तब्बल १२ प्राप्त झाल्या आहेत. मिसिंगच्या, अल्पवयीन मुली, महिला, पुरुष , पळवून नेल्याच्या,पळून गेल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होत असून या गुन्ह्यांचा तपास करणे शिरूर पोलिसांपुढे आव्हान बनले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

23 मिनिटे ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

26 मिनिटे ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

29 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

2 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

22 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

22 तास ago