शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथे सुरेश ज्ञानेश्वर लंघे यांच्या शेळी आणि करडूवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे जनावरे आणि माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिरूर तालुक्यात यापूर्वीही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे अनेक प्रकार घडले आहेत. अनेक जणांचे बळी त्यामुळे गेले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये मांडवगण फराटा आणि परिसरात बिबट्याने लहान मुले, शेळ्या आणि कुत्र्यांवर हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर, वनविभागाने २५ पिंजरे लावून आणि थर्मल कॅमेरे तसेच ड्रोनच्या सहाय्याने टेहळणी करून अखेर एका बिबट्याला जेरबंद केले होते.
सविंदणे येथील ताज्या घटनेनंतर, स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. ग्रामस्थांनी सतर्क राहून आपल्या जनावरांची, आपली सुरक्षितता सुनिश्चित करावी, तसेच वनविभागाशी संपर्क साधून आवश्यक ती मदत घ्यावी.
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…