शिरूर तालुका

हरवलेला मोबाईल पोलीसांच्या इमानदारीने परत; वाहतूक अंमलदार कदम पोलिसांचे कौतुक

शिरूर (अरुणकुमार मोटे): प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि नागरिकांप्रती कर्तव्यपरायणता याचे उत्तम उदाहरण शिरूर शहरात घडले. शिरूर शहरातील विद्याधाम चौकात हरवलेला मोबाईल फोन शिरूर पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार आप्पासाहेब कदम यांनी प्रामाणिकपणे परत करत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.

लक्ष्मण कोळी रा. शिरूर, यांचा मोबाईल (दि. १६) ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता विद्याधाम चौक परिसरात हरवला होता. काही वेळानंतर मोबाईल सापडल्यानंतर त्यावर मालकाचा फोन आला. त्यावेळी अंमलदार कदम यांनी स्वतःहून संपर्क साधत मी कदम पोलीस बोलत आहे. तुमचा मोबाईल विद्याधाम चौकात सापडला आहे. तुम्ही तो ओळख करून घेऊन जावा, असे स्पष्ट सांगून मोबाईल त्यांच्या ताब्यात परत दिला. अचानक हरवलेला मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाल्याने श्कोळी यांनी दिलासा व आनंद व्यक्त केला. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत झाला असून, आप्पासाहेब कदम यांच्या प्रामाणिक वर्तणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात हरवलेल्या वस्तू मिळाल्यानंतर त्यांचा गैरवापर होण्याच्या घटना वाढताना दिसतात. मात्र, शिरूर पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार कदम यांनी प्रामाणिकपणे मोबाईल परत करून केवळ कर्तव्य निभावले नाही, तर समाजात प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे.शिरूर शहरातील सामाजिक संस्थांकडून तसेच नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले जात असून, “शहरात असे प्रामाणिक अधिकारी हेच खरी शिरूर पोलीसांची ओळख आहे,” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

20 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

22 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

1 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 दिवस ago