शिरूर तालुका

हरवलेला मोबाईल पोलीसांच्या इमानदारीने परत; वाहतूक अंमलदार कदम पोलिसांचे कौतुक

शिरूर (अरुणकुमार मोटे): प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि नागरिकांप्रती कर्तव्यपरायणता याचे उत्तम उदाहरण शिरूर शहरात घडले. शिरूर शहरातील विद्याधाम चौकात हरवलेला मोबाईल फोन शिरूर पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार आप्पासाहेब कदम यांनी प्रामाणिकपणे परत करत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.

लक्ष्मण कोळी रा. शिरूर, यांचा मोबाईल (दि. १६) ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता विद्याधाम चौक परिसरात हरवला होता. काही वेळानंतर मोबाईल सापडल्यानंतर त्यावर मालकाचा फोन आला. त्यावेळी अंमलदार कदम यांनी स्वतःहून संपर्क साधत मी कदम पोलीस बोलत आहे. तुमचा मोबाईल विद्याधाम चौकात सापडला आहे. तुम्ही तो ओळख करून घेऊन जावा, असे स्पष्ट सांगून मोबाईल त्यांच्या ताब्यात परत दिला. अचानक हरवलेला मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाल्याने श्कोळी यांनी दिलासा व आनंद व्यक्त केला. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत झाला असून, आप्पासाहेब कदम यांच्या प्रामाणिक वर्तणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात हरवलेल्या वस्तू मिळाल्यानंतर त्यांचा गैरवापर होण्याच्या घटना वाढताना दिसतात. मात्र, शिरूर पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार कदम यांनी प्रामाणिकपणे मोबाईल परत करून केवळ कर्तव्य निभावले नाही, तर समाजात प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे.शिरूर शहरातील सामाजिक संस्थांकडून तसेच नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले जात असून, “शहरात असे प्रामाणिक अधिकारी हेच खरी शिरूर पोलीसांची ओळख आहे,” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र–ऑस्ट्रेलिया जैवउत्पादन भागीदारीला मिळणार नवी गती

‘बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव; तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीवर भर मुंबई: जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि…

3 तास ago

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

17 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

17 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

17 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

20 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

21 तास ago