शिरूर तालुका

हरवलेला मोबाईल पोलीसांच्या इमानदारीने परत; वाहतूक अंमलदार कदम पोलिसांचे कौतुक

शिरूर (अरुणकुमार मोटे): प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि नागरिकांप्रती कर्तव्यपरायणता याचे उत्तम उदाहरण शिरूर शहरात घडले. शिरूर शहरातील विद्याधाम चौकात हरवलेला मोबाईल फोन शिरूर पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार आप्पासाहेब कदम यांनी प्रामाणिकपणे परत करत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.

लक्ष्मण कोळी रा. शिरूर, यांचा मोबाईल (दि. १६) ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता विद्याधाम चौक परिसरात हरवला होता. काही वेळानंतर मोबाईल सापडल्यानंतर त्यावर मालकाचा फोन आला. त्यावेळी अंमलदार कदम यांनी स्वतःहून संपर्क साधत मी कदम पोलीस बोलत आहे. तुमचा मोबाईल विद्याधाम चौकात सापडला आहे. तुम्ही तो ओळख करून घेऊन जावा, असे स्पष्ट सांगून मोबाईल त्यांच्या ताब्यात परत दिला. अचानक हरवलेला मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाल्याने श्कोळी यांनी दिलासा व आनंद व्यक्त केला. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत झाला असून, आप्पासाहेब कदम यांच्या प्रामाणिक वर्तणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात हरवलेल्या वस्तू मिळाल्यानंतर त्यांचा गैरवापर होण्याच्या घटना वाढताना दिसतात. मात्र, शिरूर पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार कदम यांनी प्रामाणिकपणे मोबाईल परत करून केवळ कर्तव्य निभावले नाही, तर समाजात प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे.शिरूर शहरातील सामाजिक संस्थांकडून तसेच नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले जात असून, “शहरात असे प्रामाणिक अधिकारी हेच खरी शिरूर पोलीसांची ओळख आहे,” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

20 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

20 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

20 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

20 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

22 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

22 तास ago