मुख्य बातम्या

उच्च न्यायालयाचा दणका: न्हावरा फाटा–करडे रस्ता रूंदीकरण प्रकरण “जैसे थे” परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश

शिरूर (अरुणकुमार मोटे): न्हावरा फाटा ते करडे या रा.मा.११८ रस्त्याचे रूंदीकरण एमआयडीसीकडून ७ मीटरवरून १५ मीटरपर्यंत सुरू करण्यात आले होते. मात्र, या कामासाठी कोणतीही कायदेशीर अधिग्रहण प्रक्रिया न राबवता शेतकऱ्यांच्या जमिनींवर थेट काम सुरू करण्यात आल्याने प्रभावित शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा करून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील काम सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या संदर्भातील अहवाल चार आठवड्यांत सादर करण्यास सांगून, तोपर्यंत “जैसे थे” परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या प्रकरणात ऍड. दिलीप बोडके, ऍड. निनाद मगर व ऍड. उदय सरोदे यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले.

याबाबत अधिक माहिती देताना शिरूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. उदय सरोदे म्हणाले, “शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही. मात्र विकास कायद्याच्या चौकटीतच व्हायला हवा. एमआयडीसीने कोणतीही अधिग्रहण प्रक्रिया न करता थेट काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. न्यायालयाच्या आदेशामुळे आता कुणाचेही नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे विकासकामे कायदेशीर चौकटीत होतील. त्यामुळे न्याय मिळेल व विकासही अडणार नाही, असा विश्वास त्यांना वाटतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

3 मिनिटे ago

‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाकडून २९५ सदनिकांची विक्री

पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सर्वसाधारण प्रवर्गातील…

10 मिनिटे ago

तगाद्याला कंटाळून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फलटण: वाठार निंबाळकर येथील शिव लॉजिस्टिक कंपनीचे मालक व ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासाहेब खोपडे (वय…

13 मिनिटे ago

‘१ मेपासून मराठी सक्ती’चा फुगा फुटला? विरोधानंतर सरकारची माघार

मुंबई: राज्यात ‘१ मेपासून मराठी सक्ती’ या घोषणेनंतर निर्माण झालेला वाद आता अधिकच गडद झाला…

19 मिनिटे ago

बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र पेटला; माफी नंतरही वाद कायम

शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप; राज्यभर आंदोलन, राजकीय प्रतिक्रिया तीव्र नागपूर: धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ…

27 मिनिटे ago

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

15 तास ago