शिरूर तालुका

महाराष्ट्र दिनानिमित्त श्री महागणपती ला चंदनाचा लेप व १००१ चिक्कू फळांचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अष्टविनायकातील महत्वाचे स्थान असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. ग्रीष्म ऋतूतील वाढती उष्णता लक्षात घेऊन श्रींच्या मूर्तीची दाहकता कमी व्हावी या उद्देशाने (दि 1) मे रोजी महागणपतीला मृदू तसेच पवित्र चंदन उटी करण्यात आली.

सोमवार (दि. 1) मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त पहाटे अभिषेक, तसेच दुपारी 12 वाजता महानैवेद्य व महापुजा मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते करण्यात आली. महाराष्ट्र दिनानिमित्त गणेश भक्त सुरेंद्र वधवा भोसरी यांच्यातर्फे महागणपतीला चंदन ओटी फुलांची सजावट करण्यात आली. तसेच गणेश भक्त सचिन दुंडे यांच्यातर्फे महागणपतीला 1001 चिक्कू फळांचा महानैवेद्य करण्यात आला. अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी दिली.

यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्यविश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी, देवस्थान कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

6 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

6 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

6 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

6 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

8 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

8 तास ago