शिरूर तालुका

महाराष्ट्र दिनानिमित्त श्री महागणपती ला चंदनाचा लेप व १००१ चिक्कू फळांचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अष्टविनायकातील महत्वाचे स्थान असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. ग्रीष्म ऋतूतील वाढती उष्णता लक्षात घेऊन श्रींच्या मूर्तीची दाहकता कमी व्हावी या उद्देशाने (दि 1) मे रोजी महागणपतीला मृदू तसेच पवित्र चंदन उटी करण्यात आली.

सोमवार (दि. 1) मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त पहाटे अभिषेक, तसेच दुपारी 12 वाजता महानैवेद्य व महापुजा मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते करण्यात आली. महाराष्ट्र दिनानिमित्त गणेश भक्त सुरेंद्र वधवा भोसरी यांच्यातर्फे महागणपतीला चंदन ओटी फुलांची सजावट करण्यात आली. तसेच गणेश भक्त सचिन दुंडे यांच्यातर्फे महागणपतीला 1001 चिक्कू फळांचा महानैवेद्य करण्यात आला. अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी दिली.

यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्यविश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी, देवस्थान कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

14 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

14 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

14 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

14 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

14 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

14 तास ago