शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील त्या निर्मार्त्यांचा बलोच चित्रपट होतोय प्रदर्शित

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील 1 सामान्य पेंटींग कलाकार ज्ञानेश गायकवाड आणि गणेश खरपुडे हा सामान्य शेतकरी कुटुंबातील दोघे जिवलग मित्र असून सामान्य शिक्रापूरकर म्हणून असलेली दोघांची ओळख आता बलोच या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते म्हणून झाली असून या त्यांच्या पहिल्याच व्यावसायिक चित्रपट निर्मिती पावलांचे कौतुक नुकतेच शिक्रापूरकरांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आवर्जून बोलावून केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दोघा मित्रांनी पानिपतच्या युद्धानंतर बलुचिस्तानातील मराठा शुरविरांची होरपळ याचे भयाण वास्तव या चिञपटात दाखवले आहे. या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तामध्ये गुलामगिरी पत्कारावी लागली होती.

पनिपतची लढाई जरी मराठ्यांसाठी पराभव असला तरी यामध्ये धगधगता इतिहास या रूपाने मांडला आहे तो या चित्रपटकथेचे लेखक प्रकाश जनार्दन पवार यांनी केले तर या कथेवर चित्रपटाचा प्रस्ताव देखील त्यांनी केला याच निमित्ताने नाट्य क्षेत्रात सध्या कार्यरत असलेले ज्ञानेश गायकवाड, गणेश खरपुडे व कोकणातल्या किर्ती वराडकर आदींसह 11 समविचारी मित्र एकत्र आले व त्यांनी सदर चित्रपट दोन वर्षांपूर्वी बनवायला घेतला.

चित्रपटामध्ये प्रविण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर अशा दिग्गज कलाकारांची फौज उतरलेली असून कोविड काळात निधन झालेले जेष्ठ संगीतकार नरेंद्र भिडे यांनी यातील तिनही गाणी श्रेया घोषाल, कैलाश खेर, अवधूत गुप्ते यांचेसाठी बनवून ठेवली. मात्र त्यांच्या पश्चात ही गाणी ध्वनिमुद्रीत केल्याचे निर्माते ज्ञानेश गायकवाड यांनी सांगितले.

मोठे व्यावसायिक आणि चित्रपट म्हणून पाऊल टाकल्याने या दोघांच्या धाडसाचे संपूर्ण शिरुर तालुक्यातून कौतुक होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आवर्जून संपूर्ण टिमला साताऱ्यात बोलाविले व संपूर्ण कथानकावर चर्चा करुन सन्मानित केल्याचे देखील ज्ञानेश गायकवाड यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

8 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

14 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

14 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

14 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

15 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago