महाराष्ट्र

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (एनआयपीएचटी) येथे आता बीबीए इन ॲग्रीबिझनेस हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला त्रिभुवन सहकारी विद्यापीठाने मान्यता दिली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ६० प्रवेशक्षमतेची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या आढावा बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावल बोलत होते. यावेळी सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, संस्थेचे संचालक मिलिंद आकरे, मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव आदी अधिकारी उपस्थित होते

मंत्री रावल म्हणाले, या नव्या अभ्यासक्रमामुळे सहकार, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, पुरवठा साखळी, कृषी उद्योग आणि ग्रामीण उद्योजकता या क्षेत्रांसाठी प्रशिक्षित तरुण तयार होतील. पणन आणि सहकार क्षेत्रात आधुनिक व्यवस्थापन कौशल्य असलेल्या युवकांची गरज असून त्यासाठी एनआयपीएचटीने जागतिक तंत्रज्ञानाच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण द्यावे. वर्षभर विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

त्रिभुवन सहकारी विद्यापीठाने तीन वर्षांच्या कालावधीसाठी 60 प्रवेश क्षमतेसह हा अभ्यासक्रम मंजूर केला असून त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे नवे दालन खुले होणार आहे.

संस्थेला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र बनवणार

यावेळी पणन मंत्री रावल यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याचे निर्देश दिले. आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून संस्थेच्या विकासासाठी सविस्तर आराखडा तयार करून नियोजन करावे, तसेच संस्थेतील सोयी सुविधा अद्ययावत ठेवून कृषी व्यवसायाशी संबंधित अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करावेत, असे त्यांनी सांगितले. शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी प्रक्रिया उद्योगात राज्यातील महिला बचतगटातील महिलांचा समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेती क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागातून चर्चासत्रे आयोजित करावीत, तसेच बियाणे निर्मिती क्षेत्रातील वाढती गरज लक्षात घेऊन विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, असेही त्यांनी नमूद केले. शासन संस्थेच्या विस्तारासाठी व सुविधा वाढीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाहीही मंत्री रावल यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

10 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

10 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

10 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

10 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

12 तास ago