शिरूर तालुका

छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो टपाल तिकिटावर लवकरच येणार

शिरुर (तेजस फडके): स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा फोटो तसेच नाव टपाल तिकिटावर यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खासदार गिरीश बापट यांना नुकतेच लेखी निवेदन मागणी केली असुन केंद्र सरकारकडुन त्यासाठी सकारात्मक उत्तर मिळाले असल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित तानाजी सोनवणे यांनी दिली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव, फोटो टपाल तिकिटावर येण्यासाठी अनेक दिवसापासूनची माझी धडपड चालू असुन लवकरच हे तिकीट येणार आहे. याबाबत केंद्र शासन सकारात्मक असल्याची माहिती सोनवणे यांनी सांगितले. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गिरीश बापट यांच्याशी लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. या पत्रामध्ये हिंदुस्थानातील तमाम जनतेचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्याप्रति असलेले कार्य महान आहे. तसेच त्यांचे आचार विचार आजच्या समाजासाठी प्रेरणादायी असुन त्यांच्या महान कायार्चा विचार करुन त्यांचे टपाल तिकीट तयार व्हावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली होती.

या लेखी स्वरुपातील पत्राचा विचार करुन केंद्र शासनाने तुमची मागणी रास्त आहे, तुमच्या मागणीचा विचार (पीएसी) कमिटी मध्ये मांडून त्यावर सखोल विचार केला जाईल, तुम्ही दिलेले लेखी पत्र आम्हाला पोहोचले असुन आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यावा, असे सकारात्मक उत्तर सोनवणे यांना मिळाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

20 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

20 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

20 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

20 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

22 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

22 तास ago