शिरूर तालुका

छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो टपाल तिकिटावर लवकरच येणार

शिरुर (तेजस फडके): स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा फोटो तसेच नाव टपाल तिकिटावर यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खासदार गिरीश बापट यांना नुकतेच लेखी निवेदन मागणी केली असुन केंद्र सरकारकडुन त्यासाठी सकारात्मक उत्तर मिळाले असल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित तानाजी सोनवणे यांनी दिली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव, फोटो टपाल तिकिटावर येण्यासाठी अनेक दिवसापासूनची माझी धडपड चालू असुन लवकरच हे तिकीट येणार आहे. याबाबत केंद्र शासन सकारात्मक असल्याची माहिती सोनवणे यांनी सांगितले. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गिरीश बापट यांच्याशी लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. या पत्रामध्ये हिंदुस्थानातील तमाम जनतेचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्याप्रति असलेले कार्य महान आहे. तसेच त्यांचे आचार विचार आजच्या समाजासाठी प्रेरणादायी असुन त्यांच्या महान कायार्चा विचार करुन त्यांचे टपाल तिकीट तयार व्हावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली होती.

या लेखी स्वरुपातील पत्राचा विचार करुन केंद्र शासनाने तुमची मागणी रास्त आहे, तुमच्या मागणीचा विचार (पीएसी) कमिटी मध्ये मांडून त्यावर सखोल विचार केला जाईल, तुम्ही दिलेले लेखी पत्र आम्हाला पोहोचले असुन आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यावा, असे सकारात्मक उत्तर सोनवणे यांना मिळाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

10 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

10 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

10 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

10 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

11 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

11 तास ago