शिरूर तालुका

रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने बालदिन उत्सवात साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे “चाचा नेहरु” म्हणुन ते लहान मुलांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु वीट भट्टीच्या धुरळ्यात जीवन हरवलेल्या बालकांच्या जीवनात मात्र कसला बालदिन. विटांनी रचलेल्या भिंती, तुटक्या फुटक्या विटा लावलेल्या भिंतीवर गळक्या छताचा निवारा अंगावर फाटके कपडे आणि आर्थिक विवंचनेत गुरफटलेले कुटुंब असे हालाखीचे जीवन या बालकांच्या नशिबी आलेले…शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय संस्थेने या बालकांच्या समवेत बालदिन साजरा केला.

सगळीकडे विविध कार्यक्रमांनी बालदिन साजरा होत असताना शिरुर येथील वीट भट्टीवरच्या या बालकांनाही बालदिन काय आहे हे समजावे तसेच त्यांना आनंद मिळावा म्हणून शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रामलिंग येथील विटभट्टी कामगार मुलांच्या वस्तीतील शाळेत केक कापुन बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.

अचानक आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे ही बालके हरखून गेली. त्यांनी हे क्षण मोठ्या आनंदात व्यतीत केले. आपल्या बालकांना एवढे आनंदात पाहून पालकही भावूक झाले. समाजातील हे उपेक्षित घटक सण उत्सवाच्या आनंदापासून वंचित राहू नये म्हणून रामलिंग संस्था वर्षातील बहुतांशी सण उत्सव वीटभट्टी कामगारांच्या कुटुंबासमवेत साजरे करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी सांगितले.

यावेळी कर्डिले यांनी या मुलांना पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख व गरीब परिस्थिती मध्ये शिक्षण कसे घ्यायचे याचे महत्त्व पटवून दिले. तसेच डॉ. वैशाली साखरे यांनी व्यसन मुक्ती यावर मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या दिवसाचे औचित्य साधून या मुलांना खाऊ वाटप केले. तसेच वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलांना साडी-चोळी देण्यात आली.

यावेळी आदिशक्ती महीला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, पोलीस मित्र संघटनेच्या कार्याध्यक्षा मिना गवारे, कायदेशीर सल्लागार वैशाली बांगर, महिला दक्षता समितीच्या सदस्या दिपाली आंबरे, राणी शिंदे, छाया हारदे, पुनम जाधव, तर्डोबाची वाडीच्या सरपंच धनश्री मोरे, सुजाता रासकर, श्रीगोंदा पंचायत समिती सदस्य कल्याणी लोखंडे, माजी सरपंच मंगल कौठाळे, ग्रामपंचायत सदस्य आशा गुंड तसेच इतर महीला मान्यवर उपस्थित होत्या

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

3 मिनिटे ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

46 मिनिटे ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

49 मिनिटे ago

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम…

57 मिनिटे ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत…

1 तास ago

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने…

1 तास ago