रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथील शहाजी संतू खळदकर यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुका युवक कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे.
मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असून, सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाज्यातील भांडवलशाहीकडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय आधिकाराचा गैरवापर करत शोषित आणि श्रमिक तसेच मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयात होणारी पिळवणूक, मानवी हक्कांचे होत असलेले उल्लंघन याबाबत समाज्यातील पीडित लोकांना न्याय देण्यासाठी मानव विकास परीषद हि संस्था काम करत आहे.
शिरुर तालुक्यातील युवकांचे संघटन करणार आहे. शिवाय, शिरुर तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवून संस्थेसाठी काम करणार आहे, असे शहाजी खळदकर यांनी निवडीनंतर सांगितले. शिरुर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…