शिरूर तालुका

देशात शेती हेच खरे व्यवसाय शिक्षण: कांतीलाल उमाप

शिक्रापूर : शालेय शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षितता त्याचप्रमाणे रॅगिंग विरोधी कायदा सर्वांनी बारकाईने समजावून घ्या. शालेय वयात विद्यार्थ्यांना दोन चाकी वाहने वापरास मनाई करा. या वयात विद्यार्थ्यांच्या अंगी कष्ट रुजविणे, शारीरिक क्षमतेचे संवर्धन करणे, विविध खेळांचे विद्यालयात आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 142 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शेती हेच खरे व्यवसाय शिक्षण आहे. याबाबत अधिकची जागरूकता करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त व श्री. गुरुदत्त प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल उमाप यांनी केले.

जातेगांव बु ॥ (ता शिरूर) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हा परिषद पुणे – माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. ७) आयोजित शिरूर, दौंड व खेड तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, संस्था संचालक सुरेश मोरे, महादेव क्षिरसागर, साहेबराव उमाप, दगडू साळुंखे, विकास प्रतिष्ठान संस्थेचे सीईओ डॉ. धनंजय परकाळे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, सहसचिव मारुती कदम ,एमकेसीएल पुणेचे समन्वयक विनायक कदम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अभिनव सिंग, राज्य टीडीएफ संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ थोरात, राज्य आश्रमशाळा मुख्याध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव बाळासाहेब चव्हाण, कार्याध्यक्ष नामदेव चौधरी, माजी अध्यक्ष तुकाराम बेनके, दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव उत्तम जावळे, माजी अध्यक्ष रामचंद्र नातू, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव रामदास पवार, शिरूर हवेली शिक्षक संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, राष्ट्रपती पारितोषिक विजेते मुख्याध्यापक कुंडलीक मेमाणे आदि पदाधिकारी व मुख्याध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर म्हणाले, “शिरूर तालुका हा गुणवंतांची व प्रशासकीय अधिकाऱ्यांची खाण आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधे विद्यार्थी सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. जिल्हयात गुणवत्ता संवर्धन चळवळ, आस्थापना विषयक शिक्षक सेवा पुस्तके पूर्तता, अभिलेखे वर्गीकरण व जतन, ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी आधिकाधिक नोंदणी वाढविणे, ग्रंथालय समृद्धता, एक पेड माँ के नाम, हर घर तिरंगा उपक्रम, इन्स्पायर अवार्ड योजना, आनंददायी शनिवार इत्यादी बाबींची शाळाप्रमुखांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.”

प्रास्ताविक प्राचार्य रामदास थिटे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश बांगर यांनी केले. आभार राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी मानले.

चौफेर वाचनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास : प्राचार्य थिटे

प्राचार्य रामदास थिटे यांचा गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मान…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

1 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

1 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

1 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

1 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

1 तास ago

‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाकडून २९५ सदनिकांची विक्री

पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सर्वसाधारण प्रवर्गातील…

2 तास ago