शिरूर तालुका

नागरीकांनी घाण करू नये म्हणून होतोय चक्क देवांच्या फोटोंचा वापर…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये महानगर बँकेमध्ये जीना चढताना कोपऱ्यात कुणी थुंकु नये म्हणून नामी शक्कल लढवत पायालगत देवदेवतांचे फोटो लावले आहेत. तसेच बाबूराव नगरमधील मोकळ्या जागेत नागरीकांनी घाण, कचरा टाकू नये म्हणून जागा मालकांनी वेगवेगळया ठिकाणी देवदेवतांचे फोटो लावलेले आहे.

सदर ठिकाणी लावण्यात आलेले हिंदू धर्मातील देवदेवतांच्या फोटोमुळे हिंदू धर्माच्या देवांची विटंबना होत असून ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. वास्तविक पाहता हिंदु धर्मामध्ये आपण आपल्या देव-देवतांचे स्थान हे पवित्र अशा मंदिरामध्ये असते. परंतु, अशा विचित्र ठिकाणी देवांचे फोटो लावून जाणीवपूर्वक त्यांचा अपमान केल्या सारखे आहे. सदर ठिकाणी हिंदू धर्मातील देव देवतांची अशा प्रकारची विटंबना थांबवून त्वरीत ते फोटो काढण्याची मागणी विश्व हिंदू परीषद बजरंग दल शिरूर प्रखंड यांनी केली आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

पाच दिवसामध्ये हिंदू धर्माचा पवित्र असा श्रावणमास चालू होत आहे. त्यामुळे बँका, हॉटेल्स, मोकळ्या जागा, रस्त्यालगत असणारे फिरते आयुर्वेदीक औषधालय यांनी असे चुकीच्या ठिकाणी असणारे देवदेवतांचे प्रतिकात्मक फोटो त्वरीत काढून टाकावेत, यासाठी बजरंग दल शिरूर यांनी महानगर बॅक यांना लेखी निवेदन दिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

3 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

3 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

3 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

4 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

5 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

5 तास ago