शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील १९ वर्षीय पुजा नरवडे या युवतीवर हल्ला करुन ठार मारणारा नरभक्षक बिबटया ४ दिवस ऊलटूनही अदयाप गजाआड न झाल्याने जांबुतसह बेट परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दिवसाही शेतामध्ये कामासाठी जाण्यास शेतकरी, मजूर घाबरत आहे.
वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून रात्रंदिवस विविध प्रयोग राबवत बिबटया पकडण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. परंतू बिबटया त्यांना हुलकावनी देत आहे. ड्रोनद्वारे, कॅमेरे लावून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे. आधीच अतिवृष्टी त्यात बिबट्याचा त्रास त्यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्या पकडण्याचे आव्हान वन विभागापुढे उभे निर्माण झाले आहे.
शिरुर तालुक्यात शेकडो बिबटे असून ते शेतकऱ्यांच्या पशूधनाबरोबरच नागरीकांवर हल्ले करत असल्याने त्यांना तात्काळ वेळीच पकडून न नेल्यास असे प्रसंग वारंवार उद्भवणार आहे. बिबटयांना पकडून माणिकडोह येथे बिबट निवारण केंद्रात सोडले जाते. तेथून ते पुन्हा या भागात येत असल्याचे नागरीक सांगत आहे. त्यांचा वनविभागाने कायमच बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…