शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील १९ वर्षीय पुजा नरवडे या युवतीवर हल्ला करुन ठार मारणारा नरभक्षक बिबटया ४ दिवस ऊलटूनही अदयाप गजाआड न झाल्याने जांबुतसह बेट परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दिवसाही शेतामध्ये कामासाठी जाण्यास शेतकरी, मजूर घाबरत आहे.
वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून रात्रंदिवस विविध प्रयोग राबवत बिबटया पकडण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. परंतू बिबटया त्यांना हुलकावनी देत आहे. ड्रोनद्वारे, कॅमेरे लावून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे. आधीच अतिवृष्टी त्यात बिबट्याचा त्रास त्यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्या पकडण्याचे आव्हान वन विभागापुढे उभे निर्माण झाले आहे.
शिरुर तालुक्यात शेकडो बिबटे असून ते शेतकऱ्यांच्या पशूधनाबरोबरच नागरीकांवर हल्ले करत असल्याने त्यांना तात्काळ वेळीच पकडून न नेल्यास असे प्रसंग वारंवार उद्भवणार आहे. बिबटयांना पकडून माणिकडोह येथे बिबट निवारण केंद्रात सोडले जाते. तेथून ते पुन्हा या भागात येत असल्याचे नागरीक सांगत आहे. त्यांचा वनविभागाने कायमच बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…