शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील १९ वर्षीय पुजा नरवडे या युवतीवर हल्ला करुन ठार मारणारा नरभक्षक बिबटया ४ दिवस ऊलटूनही अदयाप गजाआड न झाल्याने जांबुतसह बेट परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दिवसाही शेतामध्ये कामासाठी जाण्यास शेतकरी, मजूर घाबरत आहे.
वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून रात्रंदिवस विविध प्रयोग राबवत बिबटया पकडण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. परंतू बिबटया त्यांना हुलकावनी देत आहे. ड्रोनद्वारे, कॅमेरे लावून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे. आधीच अतिवृष्टी त्यात बिबट्याचा त्रास त्यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्या पकडण्याचे आव्हान वन विभागापुढे उभे निर्माण झाले आहे.
शिरुर तालुक्यात शेकडो बिबटे असून ते शेतकऱ्यांच्या पशूधनाबरोबरच नागरीकांवर हल्ले करत असल्याने त्यांना तात्काळ वेळीच पकडून न नेल्यास असे प्रसंग वारंवार उद्भवणार आहे. बिबटयांना पकडून माणिकडोह येथे बिबट निवारण केंद्रात सोडले जाते. तेथून ते पुन्हा या भागात येत असल्याचे नागरीक सांगत आहे. त्यांचा वनविभागाने कायमच बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…