शिरूर तालुका

पोलिसांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे हरवलेला मोबाईल सापडल्याने त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच…

ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांचे स्तुत्य कार्य

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बी.जे. कॉर्नर परिसरात वाहतूक नियमन करत असताना ट्रॅफिक पोलिसांनी दाखवलेली सजगता व प्रामाणिकपणा याचे कौतुक होत आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल फोन योग्य तपासणी करून तो प्रत्यक्ष मालकाच्या हाती परत करताना मानवतेचे उत्तम उदाहरण घालून दिले.

सदर मोबाईल एका गवंडी काम करणाऱ्या गरीब मजुराचा होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कष्ट करून पोट भरणाऱ्या या मजुरासाठी तो मोबाईल म्हणजे संपर्काचे एकमेव साधन होते. मोबाईल हरवल्यानंतर त्याच्यावर संकटाचे सावट होते. मात्र, ट्रॅफिक पोलीस वाघमोडे यांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल आपल्या ताब्यात घेत त्याची तातडीने चौकशी करून संबंधित मालकाचा शोध घेतला आणि मोबाईल त्याच्या ताब्यात दिला.

मोबाईल मिळाल्यावर मजुराच्या डोळ्यात अश्रू तरळले. “मी खुप गरीब माणूस आहे. हा मोबाईल म्हणजे माझ्या मुलांशी, नातेवाईकांशी संपर्क ठेवण्याचेच साधन होते. तो परत मिळवणे माझ्यासाठी स्वप्नवत होते,” असे सांगताना त्याने पोलिसांचे आभार मानले.

या घटनेमुळे शिरूर पोलीस दलातील ट्रॅफिक विभागाची प्रतिमा आणखी उजळली आहे. ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांच्या प्रामाणिक आणि सहृदय वृत्तीमुळे नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबद्दलचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. यावेळी सोबत पोलीस अमलदार आप्पासाहेब कदम, सचिन गोरे हे उपस्थित होते.

या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांमुळेच “पोलीस फक्त कायदा रक्षक नव्हे, तर समाजाचे हितचिंतक सुद्धा आहेत” हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

4 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

14 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

14 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

14 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

14 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

14 तास ago