कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसायाकडे वळाले. मध्यंतरी काही दिवसांपुर्वी दुधाच्या वाढलेल्या दरामुळे बेरोजगार तरुण वर्गही मोठया प्रमाणात दूध व्यवसायाकडे वळाला आहे. मागील सोळा-सतरा महिन्यांपासून गाय व म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत होता. मात्र पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरुवात झाली असल्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या युवकांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या दूध दराची अंमलबजाणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ऐन सणासुदीच्या तोंडावर एकीकडे दुधाच्या दरात घसरण झाली असुन दुसरीकडे मात्र पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सगळीकडे दुधाला चांगली मागणी असतानाही दर कमी होत आहेत. मागील वर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला दुधाला प्रति लिटर ३९ रुपये दर मिळाला होता. त्यामुळे तरुणाई दुध व्यवसायाकडे वळली. बँकेचे, पतसंस्थेचे तसेच वेळप्रसंगी सावकाराचे कर्ज घेऊन, तरुण या व्यवसायात गुंतला आहे. परंतु दुध दर कपातीमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. नव्याने दुध धंद्यात आलेला तरुण वर्ग कर्जाच्या विळख्यात अडकणार आहे. दुग्धजन्य पदार्थांना मागणी असूनही दूध दरात कपात केल्याने दुध व्यावसायिकांच्या पुढील संकट वाढले आहे.
दुधाला सध्या प्रत्यक्षात उत्पादन खर्चा एवढा सुद्धा दर मिळत नाही. दुधाचा लिटरमागे दहा रुपये दर वाढला असला तरी प्रतिलिटर उत्पादन खर्चाशी बरोबरी करत नसल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. या काळात शेतकऱ्यांनी जगावे की मरावे अशी अवस्था झाली असुन दुधाला प्रतिलिटर ५५ रुपये उत्पादन खर्च असुन दुधाला प्रतिलिटर ३६ रुपये एवढा दर मिळत असुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुपटीने तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
योगेश पुंडे, उपसरपंच कान्हूर मेसाई
या वर्षी मे आणि जून महिन्यात गायीच्या दूधाला ३८ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला होता. त्यावेळी शासनाने अध्यादेश काढून गायीच्या दूधाला कमीत कमी ३४ रुपयांपेक्षा कमी दर द्यायचा नाही असे स्पष्ट केले. परंतु हा अध्यादेश काढल्यापासून दूध दरात टप्याटप्याने घट होत गेली. जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पाच रुपयांनी गायीच्या दुधाचे दर कमी झाले. तर दिवाळीनंतर त्या दरात आणखी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे गायीचे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच प्रचंड मोठया प्रमाणात वाढलेले पशुखाद्याचे तसेच चाऱ्याचे दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अजूनच अडचणीत आला आहे.
गिरीष शिंदे, दूध उत्पादक शेतकरी
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…