शिरूर तालुका

वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता विद्यालय सन 1998-1999चे माजी विद्यार्थी तब्बल 24 वर्षानंतर एकत्र आले होते. दिवाळीच्या सुटीत अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यशानंतरची शाबासकी, वर्गात बाकावर बसून केलेल्या ‘खोड्या, शाळेशी जोडलेले ऋणानुबंध उलगडत आणि शाळेतील संस्काराच्या बिजेमुळे घडलेल्याची ग्वाही देत ऐन दिवाळीच्या सुट्टीत कालिकामाता विद्यालयात वर्ग भरला होता. कार्यक्रमाला गुरुजन सतीश चंद्र पाटील, संजय मचाले, भास्कर वाबळे, बाळासाहेब शेळके, सुरेखा शेळके, संजय भोसले, प्रदीप लौंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेट वस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. शाळेमुळे गुरुजनांमुळे आयुष्याचा पाया रचना गेला. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच ज्या सवंगड्यासोबत शिक्षणाची सुरववात केली, त्यांच्या सोबत जुन्या आठवणी जागृत झाल्या. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले.

वाघाळे गावचा सुपुत्र आणि सेवानिवृत्त जवान विकास दंडवते यांनी भावना व्यक्त केल्या. शाळेपासून ते लष्करामध्ये जाण्यासाठी शाळा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच जिद्द आणि मेहनतीची जोड किती महत्वाची आहे, हे सांगतानाच सर्वांचे आभार मानले. ‘आपल्या यशाची पायरी न थांबवता, लष्करामधून निवृत होऊन ते महाराष्ट्र पोलिस मध्ये रुजू होऊन पुन्हा एकदा देशसेवा करत आहेत. विकास दंडवते हे लष्करातील आठवणी आणि भावना व्यक्त करत असताना अनेकांना गहिवरून आले होते. अभिमानास्पद कामगिरी करत असल्यामुळे अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी विद्यार्थी अमोल गोरडे, विकास दंडवते, संदीप सोनवणे, राजू वीर, राहुल गोरडे, दिलीप थोरात, सिद्धेश बांगर, वनिता औटी, सविता फंड, कविता नवले, अर्चना चव्हाण, कीर्ति ठोंबरे, रामदास कारकुड, तानाजी भोसले, रमेश शिंदे, भानुदास थोरात, तुकाराम कारकुड, शहाजी भोसले, कैलाश भोसले, उत्तम कारकुड, प्रकाश बेंडभर, गिताराम भोसले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक आणि आभार विकास दंडवते यांनी मानले.

कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!

वाघाळेच्या मुलींचा सतत सहा वर्ष तर मुलांचा आठ वर्ष खो खो मध्ये डंका

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

2 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

2 दिवस ago