शिरूर तालुका

विठ्ठलवाडीत भरला बावीस वर्षांनी पुन्हा दहावीचा वर्ग

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या पाण्याच्या समस्येसाठी बोअरवेल

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयातील सन २००१ साली परीक्षा देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला असल्याने विठ्ठलवाडीत 22 वर्षांनी 10 वी चा वर्ग भरल्याचे दिसून आले आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर येथे तब्बल 22 वर्षांनी सर्व वर्गमित्र एकत्र आल्याने आगळा वेगळा आनंद निर्माण झाला होता. यावेळी विद्यार्थ्यांचे तत्कालीन शिक्षक देखील उपलब्ध असताना आपले विद्यार्थी देशसेवेत, माजी सैनिक, व्यावसायिक, कामगार, शेतकरी, पुढारी, गृहिणी व कला कौशल्य आदी क्षेत्रात कार्यरत असल्याचे पाहून शिक्षकांना देखील समाधान वाटले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेकांना जुन्या आठवणींमुळे अश्रू अनावर झाले.

माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू तसेच विद्यालयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 51 हजार रुपये किमतीचा बोअरवेल खोदून आणि पंपसेट बसवून दिला यावेळी शाळेचे सेवानिवृत्त तसेच आजी माजी शिक्षक, मुख्याध्यापक तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते, तर सदर माजी विद्यार्थी मेळाव्यात ४७ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते तर सामुदायिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

2 तास ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

2 तास ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

2 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

3 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

23 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

23 तास ago