माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या पाण्याच्या समस्येसाठी बोअरवेल
शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयातील सन २००१ साली परीक्षा देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला असल्याने विठ्ठलवाडीत 22 वर्षांनी 10 वी चा वर्ग भरल्याचे दिसून आले आहे.
विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर येथे तब्बल 22 वर्षांनी सर्व वर्गमित्र एकत्र आल्याने आगळा वेगळा आनंद निर्माण झाला होता. यावेळी विद्यार्थ्यांचे तत्कालीन शिक्षक देखील उपलब्ध असताना आपले विद्यार्थी देशसेवेत, माजी सैनिक, व्यावसायिक, कामगार, शेतकरी, पुढारी, गृहिणी व कला कौशल्य आदी क्षेत्रात कार्यरत असल्याचे पाहून शिक्षकांना देखील समाधान वाटले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेकांना जुन्या आठवणींमुळे अश्रू अनावर झाले.
माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू तसेच विद्यालयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 51 हजार रुपये किमतीचा बोअरवेल खोदून आणि पंपसेट बसवून दिला यावेळी शाळेचे सेवानिवृत्त तसेच आजी माजी शिक्षक, मुख्याध्यापक तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते, तर सदर माजी विद्यार्थी मेळाव्यात ४७ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते तर सामुदायिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…