मुंबई: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, भाजपाने पार्थ पवारांना विरोध केल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत भाजपाने कोणालाही विरोध केलेला नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे.
पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “भाजपाने कोणालाही विरोध केलेला नाही. यासंदर्भात भाजपाशी कोणतीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला पद द्यायचं हे निर्णय ते स्वतः घेतात.”
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत आमदार, खासदार, मंत्री, अध्यक्ष यासंदर्भात जे निर्णय घेतले, त्यात भाजपाने कधीही हस्तक्षेप केलेला नाही.दरम्यान, अजित पवार विलिनीकरणाबाबत चर्चा करत होते का, या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “जर अजित पवार साहेब विलिनीकरणासाठी चर्चा करत असते, तर त्यांनी भाजपाला सांगितलं नसतं का? चर्चा करायची की नाही, विलिनीकरण करायचं की नाही, हा सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. मात्र कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा होईल, इतकी अपेक्षा आहे.”
राजकीय गोंधळावर टीका करताना फडणवीस म्हणाले, “रोज काहीतरी गोंधळ निर्माण करून कन्फ्युजन इको सिस्टीमद्वारे पसरवणं ही चुकीची पद्धत आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी उघड करू शकतो.”आपले आणि अजित पवार यांचे संबंध अत्यंत चांगले होते, असं सांगत फडणवीस म्हणाले, “मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आदल्या दिवशी आम्ही जवळपास एक तास गप्पा मारत बसलो होतो.”
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर होणाऱ्या टीकेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. साथीदारांनी जो निर्णय घेतला, त्याच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे.”अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर उपस्थित केल्या जात असलेल्या संशयांवर फडणवीस म्हणाले, “DGCA ची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला असून पायलट्समधील संभाषणासह सर्व माहिती त्यात उपलब्ध असते. त्यामुळे सत्य लवकरच समोर येईल.”
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…