मुंबई: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, भाजपाने पार्थ पवारांना विरोध केल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत भाजपाने कोणालाही विरोध केलेला नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे.
पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “भाजपाने कोणालाही विरोध केलेला नाही. यासंदर्भात भाजपाशी कोणतीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला पद द्यायचं हे निर्णय ते स्वतः घेतात.”
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत आमदार, खासदार, मंत्री, अध्यक्ष यासंदर्भात जे निर्णय घेतले, त्यात भाजपाने कधीही हस्तक्षेप केलेला नाही.दरम्यान, अजित पवार विलिनीकरणाबाबत चर्चा करत होते का, या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “जर अजित पवार साहेब विलिनीकरणासाठी चर्चा करत असते, तर त्यांनी भाजपाला सांगितलं नसतं का? चर्चा करायची की नाही, विलिनीकरण करायचं की नाही, हा सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. मात्र कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा होईल, इतकी अपेक्षा आहे.”
राजकीय गोंधळावर टीका करताना फडणवीस म्हणाले, “रोज काहीतरी गोंधळ निर्माण करून कन्फ्युजन इको सिस्टीमद्वारे पसरवणं ही चुकीची पद्धत आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी उघड करू शकतो.”आपले आणि अजित पवार यांचे संबंध अत्यंत चांगले होते, असं सांगत फडणवीस म्हणाले, “मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आदल्या दिवशी आम्ही जवळपास एक तास गप्पा मारत बसलो होतो.”
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर होणाऱ्या टीकेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. साथीदारांनी जो निर्णय घेतला, त्याच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे.”अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर उपस्थित केल्या जात असलेल्या संशयांवर फडणवीस म्हणाले, “DGCA ची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला असून पायलट्समधील संभाषणासह सर्व माहिती त्यात उपलब्ध असते. त्यामुळे सत्य लवकरच समोर येईल.”
शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…