आग्रा: 23 जानेवारी रोजी आग्र्यातील ट्रान्स यमुना परिसरात एक भयंकर घटना घडली, ज्यात एका युवतीची तिच्या प्रियकराने क्रूरतेने हत्या केली. प्रेयसीवर संशय असल्यामुळे आरोपीने चाकूने तिचा गळा चिरला, मृतदेहाचे तुकडे केले आणि ते पोत्यात भरून शहरात फिरवले.
कुटुंबीयांनी मुलगी रात्री घरी न आल्याने शोध सुरु केला. मुलगी सापडत नसल्याने त्यांनी ट्रान्स यमुना पोलिस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन तीन टीम तयार केल्या आणि शहरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासली.तपासादरम्यान, 24 जानेवारी रोजी रात्री 1 वाजता पार्वती विहार परिसरात पोते आढळले. पोते उघडल्यावर पोलिसांना धक्का बसला; आत युवतीचा मृतदेह होता, परंतु तिचं डोके गायब होतं.
आरोपी आणि कारण
पोलीस चौकशीत आरोपी विनयने सांगितले की, तो आणि मृत युवती एकाच ऑफिसमध्ये काम करत होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते. त्याला संशय होता की युवती दुसऱ्या पुरुषाशीही संबंध ठेवते. 23 जानेवारी रोजी ऑफिसमध्ये वाद झाल्यानंतर विनयने चाकूने तिचा गळा चिरला आणि मृतदेहाचे डोके व पाय कापून पोत्यात भरले. त्यानंतर दुचाकीवर पोते लादून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर यमुना पुलावर फेकले; कापलेले डोके नाल्यात फेकले.
हत्या नंतर विनयने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तसेच युवती हरवली असल्याचे नाटक करण्यासाठी तिच्या कुटुंबासोबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला.आरोपी विनय याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, मृत युवतीचे डोके अजूनही सापडलेले नाही.
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…