महाराष्ट्र

देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत: राज्यव्यापी विश्वविक्रम

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्र प्रथम’ उपक्रमांतर्गत राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत सादर केली. या उपक्रमात दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर सात लाख शिक्षकांनीही मार्गदर्शन केले.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या माहितीप्रमाणे, या उपक्रमाची अधिकृत नोंद World Book of Records, London या आंतरराष्ट्रीय संस्थेत झाली असून यामुळे विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. यासोबतच, Asia Book of Records आणि India Book of Records यांच्याकडूनही स्वतंत्र विश्वविक्रमांची नोंद झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी १४ मिनिटांचा मार्गदर्शक व्हिडीओ उपलब्ध करून दिला.

दादाजी भुसे म्हणाले, “’राष्ट्र प्रथम’ हा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा आणि त्यांच्यामध्ये प्रखर देशभक्ती, शिस्त व एकात्मतेची भावना बळकट व्हावी, यासाठी हा उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आला. दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत हा उपक्रम सर्व शाळांमध्ये चालू राहणार आहे.”उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.राज्यव्यापी यशासाठी शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, शिक्षक, पालक आणि नागरिक यांनी सहकार्य केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

4 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

4 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

4 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

4 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

4 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

6 तास ago