क्राईम

एमईएस कार्यालयात सीबीआयचा सापळा; दोन अधिकाऱ्यांना दोन लाखांची लाच घेताना अटक

पुणे: खडकी येथील लष्करी अभियांत्रिकी सेवा कार्यालयात (मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस – एमईएस) कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सुनील निकम (असिस्टंट गॅरिसन इंजिनिअर) आणि सुरेश म्हस्के (कनिष्ठ अभियंता) अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. अटकेनंतर सीबीआयने त्यांच्या घरांवर छापे टाकले असता मोठ्या प्रमाणावर रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

एमईएसमार्फत शहर व जिल्ह्यातील छावणी क्षेत्रातील बांधकामे, देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. निकम आणि म्हस्के यांच्याकडे कंत्राटदारांच्या बिलांना मंजुरी देण्याची जबाबदारी होती. याच कामासाठी त्यांनी एका ठेकेदाराकडे सहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. बिल मंजुरीसाठी वारंवार तगादा लावला जात असल्याने संबंधित ठेकेदाराने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची काही दिवस पडताळणी केल्यानंतर ती सत्य असल्याचे निष्पन्न झाल्यावर शुक्रवारी सीबीआयने एमईएस कार्यालयात सापळा रचला. यावेळी सुरेश म्हस्के याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तपासात सुनील निकम याचाही सहभाग उघड झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली.या कारवाईमुळे संरक्षण विभागाच्या बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

9 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

9 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

9 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

10 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

10 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

10 तास ago