मुंबई: महिलांसाठी महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. जानेवारी महिना संपून एक आठवडा उलटून गेला तरीही हप्ता न मिळाल्याने राज्यातील लाखो लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत एकूण १७ महिन्यांचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले असून, त्याद्वारे प्रत्येक महिलेला २५ हजार ५०० रुपये मिळाले आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळाल्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जानेवारीचा रखडलेला हप्ता आणि चालू फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार का, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे. मात्र यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
राज्य सरकारने जुलै २०२४ मध्ये ही योजना सुरू केल्यानंतर ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. मात्र मागील दोन ते तीन महिन्यांत अनेक महिलांना हप्ते मिळाले नाहीत. शासनाकडून काही लाभार्थी महिलांची नावे अपात्र ठरवून वगळण्यात आली आहेत.
चारचाकी वाहन असणे, एकाच रेशनकार्डवर तीनपेक्षा अधिक नावे असणे, तसेच ‘केवायसी’ प्रक्रियेदरम्यान चुकीची माहिती भरली जाणे, या कारणांमुळे अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर अपात्रतेच्या निकषांवरून मागील दोन महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.
फेब्रुवारी महिना सुरू होऊनही अद्याप हप्ता न मिळाल्याने, जानेवारीचा विलंब म्हणजे पुन्हा नाव वगळण्याची नांदी तर नाही ना? अशी शंका अनेक लाभार्थी महिलांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारकडून याबाबत लवकरच स्पष्ट भूमिका मांडली जाण्याची अपेक्षा महिलांकडून व्यक्त होत आहे.
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…