तासगावच्या बलगवडे गावात दुपारपर्यंत एकही मतदान नाही
मुंबई: एकीकडे सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाचा उत्साह दिसत असताना, तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील नागरिकांनी मात्र लोकशाहीच्या या उत्सवावर बहिष्कार टाकत तीव्र संताप व्यक्त केला आहे. गावात उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ संपूर्ण गावाने मतदानाकडे पाठ फिरवली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बलगवडे गावाच्या गायरान जमिनीवर राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासून जपलेल्या सुमारे साडेबारा हजार झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही वृक्षतोड बेकायदेशीर असून यामुळे गावातील पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
दुपारपर्यंत एकही मत नाही
बलगवडे गावाची एकूण मतदारसंख्या सुमारे २३०० इतकी आहे. प्रशासनाकडून दोन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, सौर प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून संपूर्ण गावाने बंद पाळत मतदानावर बहिष्कार टाकला. सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होऊनही दुपारपर्यंत एकही मतदार मतदानासाठी केंद्रावर न आल्याचे चित्र होते. मतदान केंद्रांवर केवळ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रकल्प गावाबाहेर हलवण्याची ठाम मागणी
“आम्ही पर्यावरण रक्षणासाठी स्वतः झाडे लावली, त्याच झाडांची सरकारी प्रकल्पासाठी कत्तल करण्यात आली. त्यामुळे हा सौर ऊर्जा प्रकल्प गावातून तात्काळ हटवून अन्यत्र हलवावा,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.एकीकडे शासन वृक्षारोपणाचा संदेश देत असताना, दुसरीकडे सरकारी प्रकल्पासाठीच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने प्रशासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…