क्राईम

उल्हासनगरातील भूमाफियांची चौकशी क्राईम ब्रांचकडे

खंडणीचा खोटा गुन्हा बुमरॅंग होणार

मुंबई: उल्हासनगरातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची व हितसंबंधितांविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता घोटाळेबाजांवरच बुमरॅंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

मागील महिन्यांत २८ तारखेला हिललाईन पोलिस स्थानकात १ कोटी रुपयांची खंडणी मागत ५ लाख खंडणी घेतल्याबाबतचा खोटा गुन्हा कोणतेही पुरावे नसतांनाही प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील व शैलेश तिवारी यांच्याविरोधात पोलिसांनी नोंद केला.

अश्या खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होवू शकतात, याबाबत ॲड. पाटील यांनी लेखीपत्राद्वारे अगोदरच पोलिस विभागाला कळविले होते. तरीही, पोलिसांनी कसलीही खातरजमा न करता अधिकारांचा गैरवापर करत घोटाळेबाजांशी संगनमत करत गुन्हा दाखल केला. त्याविरोधात पीडित सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट पोलिस आयुक्त कार्यालयावरच धडक देत बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करला. उल्हासनगर महानगरपालिकेतील नगररचनाकार ललित खोब्रागडे यांचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ॲड. पाटील यांनी केला.

३ जाने २०२५ रोजी पोलिस आयुक्त , ठाणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू झाल्याचं कळताच माजी राज्यमंत्री तथा मा. आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आंदोलकांची भेट घेऊन प्रकरण जाणून घेतलं व पोलिस आयुक्तांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.

त्या अनुषंगाने मा. पोलिस आयुक्तांनी सदर तपास स्वतःच्या निरीक्षणात क्राईम ब्रांचकडे सखोल चौकशीकरीता सुपूर्द करत असल्याचे आदेश देत संबंधीत दोषी अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

या चौकशीतून उल्हासनगरातील टीडीआर घोटाळ्याची पाळंमुळंही खणली जाण्याची शक्यता असून सामाजिक कार्यकर्त्यांना खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न घोटाळेबाजांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अलिकडच्या काळात भ्रष्टाचार, घोटाळ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्ते तसंच नागरिकांना कायद्याचा धाक दाखवण्याचे प्रकार वाढले असून त्या विरोधात समाजात असंतोष आहे. त्यामुळेच की काय, या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व वकील सामील झाले होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्यात ३६ जिल्ह्यांत सुरू होणार सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे; प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणार जिल्ह्यातच मार्गदर्शन

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि विविध प्रवेश प्रक्रियांबाबत…

1 सेकंद ago

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालत आदिवासी विकासासाठी सरकार कटिबद्ध; एकनाथ शिंदे

मुंबई: भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या…

14 मिनिटे ago

गिरीष महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई: ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे केलेले वक्तव्य बेजबाबदार, राष्ट्रहिताला…

20 मिनिटे ago

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्व घडविण्यासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; MSFDA कडून विशेष नेतृत्व विकास कार्यक्रम

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला नेतृत्व अधिक सक्षम…

23 मिनिटे ago

नेत्रदान, पर्यावरण संवर्धन आणि योगाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती; राज्यभर NSS चे विशेष अभियान सुरू

मुंबई: विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि निरोगी जीवनशैली रुजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS)…

32 मिनिटे ago

ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका; सुनेत्रा पवार यांचे आश्वासन

मुंबई: ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनता दरबारात भेट घेऊन…

42 मिनिटे ago