आरोग्य

३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात ‘ही’ ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात

डायबिटीस हा आजार देशात वेगाने वाढत आहे. हा एक लाइफस्टाईल संबंधित आजार असून देशात रूग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. डायबिटीस आजाराला सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी रूग्णांना आयुष्यभर मेहनत करावी लागते. डायबिटीस रूग्णांना शरीराला हळूहळू आजारी करतो आणि कमजोर करतो.

धक्कादायक बाब म्हणजे डायबिटीसच्या रूग्णांमध्ये किडनी खराब होणे, डोळ्यांसंबंधी समस्या होणे आणि हृदयरोगांचा धोका होणे अशा समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. तसेच पायांच्या नसांमध्ये वेदना, त्वचेसंबंधी समस्यांसाठीही डायबिटीस कारणीभूत असतो.

डायबिटीस या आजारावर कोणताही ठोस उपाय नाहीये. हा आजार केवळ नियंत्रित ठेवला जाऊ शकतो. ज्यासाठी रूग्णाला खूप काळजी घ्यावी लागते. अशात २५ ते ३० वयात हा आजार झाल्यावर कोणत्या समस्या होतात किंवा त्याची काय लक्षणे हे दिसतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला वेळीच योग्य ते उपचार घेता येतील.

३० वयात डायबिटीसची लक्षण

डोळ्यांची समस्या

हाय ब्लड शुगर लेव्हल किंवा डायबिटीस झाल्यावर डोळ्यांचं नुकसान होतं. शुगरच्या आजारात शरीरातील नसा डॅमेज होतात आणि कमजोर होतात. या कारणाने नसांमधील ब्लड सप्लाय स्लो होतो. डोळ्यांमध्येही ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित न झाल्याने रेटिनावर प्रभाव पडतो. यामुळे डायबिटीस रेटिननोपॅथीचा धोका वाढतो. त्याशिवाय रेटिनाचा मुख्य भाग मॅक्यूलामध्येही सूज वाढते. ज्यामुळे डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. धुसर दिसणे, बारीक अक्षर वाचण्यात अडचण, डोळ्यांमध्ये डाग, डोळ्यात चिरटपणा इत्यादी समस्या होतात.

पुन्हा पुन्हा तहान लागणं

कोणत्याही वयात डायबिटीस झाल्यावर सगळ्यात आधी जे लक्षण दिसतं ते म्हणजे पुन्हा पुन्हा तहान लागणं. भरपूर पाणी प्यायल्यानंतरही तहान भागत नाही आणि सतत पाणी पिण्याची ईच्छा होते. अनेकदा खूप जास्त पाणी प्यायल्यानं पोटदुखी आणि पोटात जडपणा जाणवतो.

पुन्हा पुन्हा लघवी लागणं

डायबिटीसच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणं याचीही समावेश आहे. खूप जास्त पाणी प्यायल्याने शरीरात लघवीचं निर्माण अधिक प्रमाणात होतं. याच कारणाने डायबिटीसच्या रूग्णांना पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं. तसेच लघवीचा रंगही गर्द होण्यासारखं लक्षणं डायबिटीसच्या रूग्णांमध्ये दिसतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

6 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

14 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago