शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे पती पत्नीच्या घरगुती वादातून पतीसह त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करुन जखमी करत युवकाचा काटा काढण्याची धमकी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल अनंता एरंडे, महेंद्र घुले, विशाखा गुंडाळ यांसह चार युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाजीचा मळा येथील अमित गुंडाळ व विशाखा गुंडाळ या दोघांमध्ये १८ जानेवारी रोजी किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर आरडाओरडा केल्याचा आवाज आल्याने महेश गुंडाळ घराबाहेर आले. त्यावेळी विशाखा गुंडाळ हि तिच्या भावासह काही युवकांना घेऊन महेशचा भाऊ व विशाखाचा पती असलेल्या अमित गुंडाळ याला मारहाण करत होती.
यावेळी महेश व त्याचे आई वडील भांडणे सोडवण्यास गेले असता मारहाण करणाऱ्या सर्वांनी महेश सह त्याचे आई वडील, आजी आजोबांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली यामध्ये महेश गुंडाळ जखमी झाला आहे, तर यावेळी मारहाण करणाऱ्या युवकांनी अमित गुंडाळ यास रविवार पर्यंत तुझा काटा काढणार अशी धमकी दिली.
याबाबत महेश हरीश्चंद्र गुंडाळ (वय २८) रा. वढू बुद्रुक अनाजीचा मळा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विशाल अनंता एरंडे, महेंद्र घुले, विशाखा गुंडाळ यांसह चार अनोळखी युवक सर्व रा. थुगाव भावडी ता. आंबेगाव जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…