शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मित्राची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर शिरुर तालुक्यातील वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी हा शिक्रापूर पोलिसांना तब्बल सहा महिने गुंगारा देत होता मात्र शिक्रापूर पोलिसांनी माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी यास अटक केली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाळासाहेब लांडे यांचा मित्र असलेला वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी याने काही दिवसांपूर्वी लांडे यांच्या घरी येऊन काही कामानिमित्त बाळासाहेब लांडे यांची एम एच १२ एच के ६६७७ की स्कोर्पिओ कार नेली होती, त्यांनतर अनेक दिवस उलटून देखील सचिन माळी हा स्कोर्पिओ घेऊन आला नाही. त्यानंतर सचिन माळी हा वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
बाळासाहेब राजाराम लांडे (वय ४१) रा. लांडेवस्ती तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता शिक्रापूर पोलिसांनी वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन सीताराम माळी रा. वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध मे २०२२ मध्ये गुन्हे दाखल केले होते. मात्र गुन्हे दाखल झाल्यापासून माळी हा पोलिसांना गुंगारा देत होता अखेर काल सायंकाळच्या सुमारास सचिन माळी हा कोरेगाव भीमा परिसरात येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली.
त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, पोलीस शिपाई भास्कर बुधवंत यांनी सदर ठिकाणी जात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रशेखर उर्फ सचिन माळी यास अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर व पोलीस शिपाई भास्कर बुधवंत हे करत आहे.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…