शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मित्राची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर शिरुर तालुक्यातील वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी हा शिक्रापूर पोलिसांना तब्बल सहा महिने गुंगारा देत होता मात्र शिक्रापूर पोलिसांनी माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी यास अटक केली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाळासाहेब लांडे यांचा मित्र असलेला वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी याने काही दिवसांपूर्वी लांडे यांच्या घरी येऊन काही कामानिमित्त बाळासाहेब लांडे यांची एम एच १२ एच के ६६७७ की स्कोर्पिओ कार नेली होती, त्यांनतर अनेक दिवस उलटून देखील सचिन माळी हा स्कोर्पिओ घेऊन आला नाही. त्यानंतर सचिन माळी हा वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
बाळासाहेब राजाराम लांडे (वय ४१) रा. लांडेवस्ती तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता शिक्रापूर पोलिसांनी वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन सीताराम माळी रा. वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध मे २०२२ मध्ये गुन्हे दाखल केले होते. मात्र गुन्हे दाखल झाल्यापासून माळी हा पोलिसांना गुंगारा देत होता अखेर काल सायंकाळच्या सुमारास सचिन माळी हा कोरेगाव भीमा परिसरात येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली.
त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, पोलीस शिपाई भास्कर बुधवंत यांनी सदर ठिकाणी जात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रशेखर उर्फ सचिन माळी यास अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर व पोलीस शिपाई भास्कर बुधवंत हे करत आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…