क्राईम

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्यावर दगडफेक करत कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना रविवारी (ता. २७) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. संपत गणपत काळे असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या तक्रारीवरुन संजय राजाराम काळे आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडनदी किनारी असलेली पाण्याची विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेलेले असताना मोटारीवर संरक्षणासाठी टाकण्यात आलेल्या काट्या बाजूला करुन मोटारीजवळ पाणी आहे की नाही, याची पाहणी करत असताना अचानक अज्ञात व्यक्तीने पाठीमागून त्यांच्या दिशेने फेकलेला दगड त्यांच्या पाठीवर लागला. हा दगड लागल्यानंतर नेमके काय घडत आहे, हे समजण्यापूर्वीच संजय राजाराम काळे याने “तुझी मोटार आताच्या आता उचल, नाहीतर तुला सोडणार नाही,” अशी धमकी देत हातातील कुऱ्हाड संपत काळे यांच्या डोक्यात मारली कुऱ्हाडीचा घाव बसताच त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. तशाच जखमी अवस्थेत संपत काळे यांनी सुरेश बाळासो काळे यांना फोन करुन मदत मागितली. त्यानंतर मयूर काळे आणि शिवाजी काळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला प्रथम निमोणे येथे उपचारासाठी नेले. पुढील उपचारांसाठी त्यांना शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रताप टेंगले करत आहेत.

शेतकऱ्याने पाणी उचलायचे की जीव वाचवायचा…?
शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या भागात शेतीच्या पाण्यावरुन, विद्युत मोटारींवरुन, पाइपलाइन तसेच नदीपात्रातील जागेच्या वापरावरुन वारंवार वाद निर्माण होत आहेत. मात्र, हे वाद प्रारंभीच्या टप्प्यातच मिटवण्यासाठी महसूल प्रशासन, जलसंपदा विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून प्रभावी समन्वय होत नसल्याचे या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीला पाणी देण्यासाठी नदीकिनारी जाणेही जीवघेणे ठरणार असेल, तर ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था नेमकी कोणाच्या भरवशावर आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच दिवसाढवळ्या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचे जर कुणी धाडस करत असेल, तर गुन्हेगारांना प्रशासनाचा धाक उरला आहे का…? याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

शिरूरच्या पुर्वभागात अवैध धंद्याचा सुळसुळाट; प्रशासन अवैध धंद्याच्या पाठीशी…?
शिरूरच्या पुर्वभागातील गावात गावठी दारु, गुटखा, जुगार, बेकायदेशीर मुरुम उपसा, माती उपसा अशा अनेक धंद्याना ऊत आला असुन पोलिस आणि महसूल प्रशासन याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. शिरूरच्या पुर्व भागातील काही गावात मुख्य चौकात असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानात सर्रास दारुविक्री केली जात आहे. परंतु या दुकानाच्या मालकाला राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी काही दिवसांपुर्वी या दुकानावर कारवाईसाठी आले असताना संबंधित मालकाने त्यांच्यावर राजकीय दबाव आणल्यामुळे कारवाई न करताच अधिकारी माघारी परत गेले. त्यामुळे शिरूरच्या पुर्व भागात पोलिस आणि महसूल प्रशासनच अवैध धंद्याना पाठीशी घालत असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

पुणे-नगर महामार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल 

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

12 मिनिटे ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

6 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

6 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

6 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

6 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

17 तास ago