शाळकरी मुलाच्या अंगावर पाणी उडाल्याने घडला प्रकार
शिक्रापूर: आरणगाव (ता. शिरुर) येथील एका महिलेचा मुलगा शाळेत जात असताना सुभाष कोकाटे या व्यक्तीकडून त्याच्या अंगावर पाणी उडाले. त्यामुळे शाळकरी मुलगा कोकाटे यांना काहीतरी म्हणाला. त्यामुळे सुभाष कोकाटे सह त्याच्या चुलत भावाने शाळकरी मुलाच्या घरी जाऊन मुलाच्या आईसह वडिलांना शिवीगाळ दमदाटी करत मारहाण करुन महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुभाष बाळासाहेब कोकाटे व तुषार भाऊसाहेब कोकाटे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आरणगाव (ता. शिरुर) येथील एक शाळकरी मुलगा शाळेत जात असताना शेजारून दुचाकीहून जाणाऱ्या सुभाष कोकाटे याने मुलाच्या अंगावर पाणी उडवले त्यामुळे मुलगा कोकाटे यांस काहीतरी बोलला त्यामुळे कोकाटे याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सायंकाळच्या सुमारास कोकाटे हा सदर मुलाच्या घरी जाऊन मुलाचे आई व वडिलांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरवात केली तसेच मुलाच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरवात केल्याने मुलाची आई मध्ये आली असता सुभाष कोकाटे याने सदर महिलेचा विनयभंग करत मारहाण केली.
दरम्यान सुभाष याचा चुलत भाऊ तुषार कोकाटे हा देखील तेथे आला त्याने देखील महिलेला मारहाण केली सदर मारहाणीमध्ये सुभाष कोकाटे याने काठीने सदर महिलेला मारहाण करत जखमी केले. याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सुभाष बाळासाहेब कोकाटे व तुषार भाऊसाहेब कोकाटे दोघे रा. अरणगाव (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.
मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत…
मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची…
नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या कथित…
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाहीर दिलगिरी व्यक्त करत…
शिरुर (तेजस फडके) शिंदोडी गावात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू फिरत असल्याचे…
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामरिक क्षेत्रात प्रभावी झेप…