ambadas-misal-jalna
जालनाः शेतातील बांध कोरल्याच्या वादावरून चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना जानेफळ दाभाडी या गावात घडली आहे. अंबादास मिसाळ असे मृत पुतण्याचे नाव असून, शिवाजी जयाजी मिसाळ असे आरोपी चुलत्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी मिसाळ आणि त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांचा जमिनीच्या बांधावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दोघांमध्ये शुक्रवारी बांध कोरण्यावरून किरकोळ वाद झाला होता. पण काही वेळात तो मिटला होता. अंबादास मिसाळ यांनी काकाच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली. काकाची समजूत काढल्यावर बाजूलाच असलेल्या घरासमोरील बाजेवर ते झोपले. याचवेळी शिवाजी मिसाळ याने अंबादास मिसाळ यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांच्या मानेवर व गळ्यावर गंभीर वार केले. यामध्ये अंबादास मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाइकांनी अंबादास यांना तत्काळ राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृतघोषित केले. या घटनेची माहीती मिळताच हसनाबाद ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या.
मयताची पत्नी रेखा अंबादास मिसाळ यांच्या तक्रारीवरून संशयित शिवाजी मिसाळ, मंदाबाई शिवाजी मिसाळ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वैशाली पवार या करीत आहेत.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…