शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत येथे महिन्याभरात बिबटयाने दोन जणांचे बळी घेतले आहे. तसेच दोघे जण गंभीर जखमी आहेत. वन विभाग अजून किती जणांचे बळी गेल्यावर जागे होणार? असा प्रश्न येथिल नागरीकांना पडला आहे.
कवठे येमाई, सविंदणे, फाकटे, चांडोह, जांबुत, माळवाडी, सरदवाडी, पिंपरखेड, टाकळी हाजी येथील ग्रामस्थ बिबटयाच्या बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे डॉ. संतोष ऊचाळे यांनी सांगितले. या परिसरात बिबट यांनी धुमाकुळ घातला असून पशुधनाबरोबर नागरीकांनाही तो भक्ष करू लागल्याने नागरीकांमध्ये प्रंचड भितीचे वातावरण पसरले आहे.
उचित कार्यवाहीसाठी जांबुत ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे. तसेच महावितरण विभागाने शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासाठीही तीव्र लढा या भागातील नागरीक करणार आहेत. सोशल मीडियावर तशा चर्चा रंगू लागल्या आहे. सदर घटनेच्या ठिकाणी सोलापूर येथे मोठे अथक परीश्रम घेत नरभक्षक बिबटया ठार केलेले शार्प शुटर डॉ. चंद्रकांत मंडलिक हे घटनास्थळी भेट देणार आहेत.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…