शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत येथे महिन्याभरात बिबटयाने दोन जणांचे बळी घेतले आहे. तसेच दोघे जण गंभीर जखमी आहेत. वन विभाग अजून किती जणांचे बळी गेल्यावर जागे होणार? असा प्रश्न येथिल नागरीकांना पडला आहे.
कवठे येमाई, सविंदणे, फाकटे, चांडोह, जांबुत, माळवाडी, सरदवाडी, पिंपरखेड, टाकळी हाजी येथील ग्रामस्थ बिबटयाच्या बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे डॉ. संतोष ऊचाळे यांनी सांगितले. या परिसरात बिबट यांनी धुमाकुळ घातला असून पशुधनाबरोबर नागरीकांनाही तो भक्ष करू लागल्याने नागरीकांमध्ये प्रंचड भितीचे वातावरण पसरले आहे.
उचित कार्यवाहीसाठी जांबुत ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे. तसेच महावितरण विभागाने शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासाठीही तीव्र लढा या भागातील नागरीक करणार आहेत. सोशल मीडियावर तशा चर्चा रंगू लागल्या आहे. सदर घटनेच्या ठिकाणी सोलापूर येथे मोठे अथक परीश्रम घेत नरभक्षक बिबटया ठार केलेले शार्प शुटर डॉ. चंद्रकांत मंडलिक हे घटनास्थळी भेट देणार आहेत.
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…