पुणे: पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीय. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेनं आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पती आणि सासूला अटक करण्यात आलीय. राणी भागवत कदम असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राणीचा पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम हे दोघेही जाच करत होते. राणीचा गेल्या काही दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती तिच्याशी वाद घालायचा. तिला घरात कोंडून ठेवणं, उपाशी ठेवणं आणि मारहाण करणं असे प्रकार होत होते.
पती आणि सासूकडून होणाऱ्या त्रासाला राणी कंटाळली होती. मानसिकदृष्ट्या खचलेल्या राणीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
राणीने सासरच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. या प्रकरणी पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम यांना अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर पत्नीचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…