क्राईम

चारित्र्यावर संशय घेत छळ, विवाहितेनं आयुष्य संपवलं; पती अन् सासूला अटक

पुणे: पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीय. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेनं आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पती आणि सासूला अटक करण्यात आलीय. राणी भागवत कदम असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राणीचा पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम हे दोघेही जाच करत होते. राणीचा गेल्या काही दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती तिच्याशी वाद घालायचा. तिला घरात कोंडून ठेवणं, उपाशी ठेवणं आणि मारहाण करणं असे प्रकार होत होते.

पती आणि सासूकडून होणाऱ्या त्रासाला राणी कंटाळली होती. मानसिकदृष्ट्या खचलेल्या राणीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

राणीने सासरच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. या प्रकरणी पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम यांना अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर पत्नीचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…

2 तास ago

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

11 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

11 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago