महाराष्ट्र

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने महाराष्ट्राच्या उद्योग, कृषी आणि निर्यात क्षेत्रासाठी जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली झाली आहेत. या करारामुळे राज्यात गुंतवणूक, रोजगार आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईत आयोजित भारत-यूके व्यापक आर्थिक व व्यापार करार अंमलबजावणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, ब्रिटिश उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि निर्यातदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत-यूके करारामुळे पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील औद्योगिक केंद्रांना मोठा लाभ होणार आहे. वाहन उद्योग, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, रसायन, आयटी, फिनटेक आणि स्टार्टअप क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच नाशिकची द्राक्षे, कोकणचा हापूस आंबा, डाळिंब, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि सागरी उत्पादनांना ब्रिटनमध्ये मोठी बाजारपेठ मिळेल.

सध्या भारत-यूके व्यापार ५६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका असून, २०३० पर्यंत तो दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. या करारामुळे भारताच्या बहुतांश निर्यातीला शुल्कमुक्त प्रवेश मिळणार असून सेवा, गुंतवणूक आणि नवोन्मेष क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.

राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, हा करार कृषी, अन्न प्रक्रिया, उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. या संधींची माहिती शेतकरी, उद्योजक आणि निर्यातदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी पणन विभाग जनजागृती आणि मार्गदर्शन करणार आहे.

ब्रिटिश उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी सांगितले की, या करारामुळे भारतातून यूकेला जाणाऱ्या ९९ टक्के वस्तूंवरील आणि यूकेमधून भारतात येणाऱ्या ९० टक्के वस्तूंवरील शुल्क कमी किंवा शून्य होईल. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्याला मोठी चालना मिळणार आहे.

कार्यक्रमात भारत-यूके व्यापार कराराचे प्रतीक म्हणून दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या आयात-निर्यातीच्या कार्गो बॉक्सचे अनावरण करण्यात आले. तसेच उद्योग विभागाच्या वतीने या कराराच्या संधींबाबत सविस्तर माहितीही सादर करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 तास ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 तास ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

2 तास ago

शिंदोडीत डाळिंबाच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला; ८० हजारांच्या डाळिबांची चोरी

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून अज्ञात चोरट्याने तब्बल ८००…

2 तास ago

ओपन विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! फीमध्ये 50% ते 100% सवलत; जाणून घ्या पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया

मुंबई: उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची फी सवलत योजना उपलब्ध…

2 तास ago

दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च शासन उचलणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या किंवा पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने…

3 तास ago