शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या तिघा व्यक्तींचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आठवडे बाजारात भिकाजी राजगुरू, असाराम नरवडे, राजेश गौड हे वेगवेगळ्या पद्धतीने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले असताना बाजारात खरेदी करत असताना त्यांचे मोबाईल त्यांनी खिशात ठेवलेले होते. काही वेळाने त्यांचे मोबाईल खिशात नसल्याचे त्यांच्या निदर्शास आले. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले, तर बाजारातून एकाच वेळी तीन लोकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटनेने बाजारासह परिसरात खळबळ उडाली.
याबाबत भिकाजी सावळेराम राजगुरू (वय ४९) रा. करंजेनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे हे करत आहे.
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…