शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या तिघा व्यक्तींचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आठवडे बाजारात भिकाजी राजगुरू, असाराम नरवडे, राजेश गौड हे वेगवेगळ्या पद्धतीने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले असताना बाजारात खरेदी करत असताना त्यांचे मोबाईल त्यांनी खिशात ठेवलेले होते. काही वेळाने त्यांचे मोबाईल खिशात नसल्याचे त्यांच्या निदर्शास आले. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले, तर बाजारातून एकाच वेळी तीन लोकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटनेने बाजारासह परिसरात खळबळ उडाली.
याबाबत भिकाजी सावळेराम राजगुरू (वय ४९) रा. करंजेनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे हे करत आहे.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…