शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या तिघा व्यक्तींचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आठवडे बाजारात भिकाजी राजगुरू, असाराम नरवडे, राजेश गौड हे वेगवेगळ्या पद्धतीने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले असताना बाजारात खरेदी करत असताना त्यांचे मोबाईल त्यांनी खिशात ठेवलेले होते. काही वेळाने त्यांचे मोबाईल खिशात नसल्याचे त्यांच्या निदर्शास आले. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले, तर बाजारातून एकाच वेळी तीन लोकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटनेने बाजारासह परिसरात खळबळ उडाली.
याबाबत भिकाजी सावळेराम राजगुरू (वय ४९) रा. करंजेनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे हे करत आहे.
शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…
पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…
तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…