महाराष्ट्र

श्री कृष्ण नगर पूल, श्रेयासाठी प्रकाश सुर्वे यांची पांगळी धडपड…

मुंबई: मला आठवतंय अगदी बरोबर एका वर्षांपूर्वी मी पर्यायी रस्ता उपलब्ध न करून देता अचानक बंद करण्यात आलेला श्री कृष्ण नगर चा पूल यावर लिखाण केले होते, यामुळे स्थानिक रहिवाश्यांचे आर्थिक आणि वेळेचे कसे नुकसान होत आहे यावर लिहले होते. यात स्थानिक नेते भास्कर खुरसंगे यांचे नियोजन कसे चुकले? आहे यावर लिहले होते, मीच नाही तर माझे मित्र लेखक दिग्दर्शकं सचिन दरेकर यांनी तसेच अनेक स्थानिकांनी ही याबाबत लिहले होते. यात या नियोजनाबद्दल सर्व दोष भास्कर खुरसंगे यांना दिला होता.

बघता बघता वर्ष सरले, पहिले दोन महिने काहीही काम सुरू झाल्याचे न दिसल्याने येता जाता आम्ही या पुलाकडे बघून प्रशासनाच्या नावाने तोंडं सुख घेत होतो. नंतर एकदाचे काम सुरू झाल्याचे दिसलें, भास्कर खुरसंगे यांचे दर आठवड्याला पुलाच्या कामाच्या प्रगतीचे मेसेज दीसत होते, आम्हा रहिवाश्याना जरा दिलासा मिळत होता, भास्कर खुरसंगे यांच्या बद्दल राग कमी होत होता, याला कारण होते, सतत आठवड्याला पुलाच्या कामाच्या प्रगतीबद्दल कळत होते, रात्री बेरात्री भास्कर खुरसंगे स्वतः या कामाच्या ठिकाणी हजर असतानाचे कळत होते.

सकाळी उठल्यावर कामावर जाताना या पुलाकडे बघताना आनंद वाटतं असायचा. बघता बघता वर्ष सरले पुलाचे बांधकाम पूर्ण झाले, फक्त दोन बाजूचे रस्ते जोडले कीं वाहतूक सुरू होईल असे वाटत असतानाच श्रेयाचे वाद सुरू झाल्याचे दिसलें, स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे या पूर्ण झालेल्या पुलावर पाहणी करत असतानाचे फोटो असलेले 40 फुटाचे मोठं मोठे बॅनर दिसलें, यावर कश्या पद्धतीने आम्ही हा पूल पूर्ण केला आणि तो आता खुला होणार असा मजकूर दिसला.

आज हे बॅनर पाहिले कीं पहिले हसू आले, पूर्ण झालेल्या पुलावर उभे राहून फोटो काढून तो पूल बनवायला किती मेहनत केली असं खोटं सांगायचं, काय हे आमदार साहेब? अहो आज श्री कृष्ण नगर, शांतीवन, ऋषींवन अशोकवन या विभागातील प्रत्येकाला खरं सत्य माहिताय, आमदार साहेब पूर्ण वर्षभर या कामाच्या ठिकाणी एकदाही तुम्ही फिरकला नाहीत, तुम्ही सुरत गुवाहाटी करण्यात मशगुल होतात, आम्ही भास्कर खुरसंगे यांना रात्र रात्र बांधकाम ठिकाणी उपस्थित राहिलेले पाहिलय, या पुलासाठी लोकांचे बोलणे खाताना पाहिलंय, त्यामुळे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा अट्टाहास करू नका, आता असे कळलेय कीं उदघाटनासाठी तुमचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या तारखा मिळत नसल्याने तुम्ही तो सुरू न करण्यासाठी प्रशासनावर दवाब आणताय, आमदार साहेब हे सर्व आम्ही सर्व स्थानिक रहिवासी पाहत आहोत. कृपया हे थांबवा, कपटाने दुसऱ्याची रेषा कमी करण्यापेक्षा स्वतः ची रेषा वाढवा, आयत्या बिळावर बसू नका.

प्रमोद शिंदे

प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड

मुंबई प्रदेश

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

9 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

9 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago