क्राईम

गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून छातीत ठोसा मारला अन्…

पुणे: गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने दुसऱ्याच्या छातीत जोरात ठोसा मारल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवार (दि.६) सायंकाळी लोहियानगर परिसरात घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सागर राजू अवघडे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सूरज नंदू सकट (वय २४, रा.लोहियानगर) याला खडक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि सूरज हे नातेवाईक असून, मोलमजुरी करत होते. गाडीची चावी न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. वादाच्या रागातून सूरजने सागरच्या छातीत ठोसा मारला. यात सागर बेशुद्ध झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरज याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

6 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

6 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

7 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

17 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

18 तास ago