मुंबई: बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती केल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने ‘विशेष चौकशी पथका’ची (एसआयटी) स्थापना केली आहे. हे पथक नागपूरसोबतच नाशिक, जळगाव, मुंबई आणि मराठवाड्यातील बीड व लातूर येथील शिक्षक भरतीची चौकशी करणार आहे.
नागपूर विभागात काही दिवसांपूर्वी बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा उघडकीस आला. अपात्र शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करून वेतन अदा करण्यात आले. बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती प्रकरणी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांना अटकही झाली. या प्रकरणात चौकशीसाठी राज्य सरकारने आता ‘एसआयटी’ नेमली आहे. पुणे येथील विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नियुक्त करण्यात आली असून, यात पोलिस महानिरीक्षक मनोज शर्मा, शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक हारुण आतार यांचा समावेश आहे. विशेष चौकशी पथकाला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. पथक मराठवाड्यातील बीड, लातूर आदी जिल्ह्यांतील २०१२ पासून ते आजतागायत प्रकरणांची चौकशी, तपास करणार आहे. सरकारच्या या निर्णयाने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आजपासून अधिकारी रजेवर
राज्यातील शिक्षण विभागातील राजपत्रित अधिकारी शुक्रवार, आठ ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजेवर जाणार आहेत. शिक्षणाधिकारी, उपसंचालक, वेतन अधीक्षक असे एक हजार अधिकारी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे अधिकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय विनाचौकशी अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी सरकारने द्यावी, अशा विविध मागण्या संघटनेच्या आहेत.
तीन महिन्यांत अहवाल
पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील तपास पथक २०१२पासून झालेल्या शिक्षक नियुक्त्यांची चौकशी करणार आहे. तीन महिन्यांच्या आत आपला तपास अहवाल समिती सरकारला सादर करणार आहे. समितीला चौकशीसाठी आवश्यक मनुष्यबळ व तांत्रिक साह्य पुरविण्याची जबाबदारी शिक्षण आयुक्त पुण्याच्या यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मान्यता, बदली तपासणार
सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवासातत्य, विना अनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी पथकाकडून केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर आता मराठवाड्यातील शिक्षक भरतीही रडारवर आल्याची चर्चा आहे.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…