सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील अभिषेक गंगावणे या युवकाचे रात्रीच्या सुमारास १० लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करुन धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या 6 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना यश आले असून अजून 6 आरोपी अदयाप फरार आहेत.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. १५) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास शिरुर मुंबई बाजार येथुन शतपावली करीत असलेले अभिषेक ईश्वर गंगावणे (वय २२) रा. मुंबईबाजार शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांना 6 सिटर रिक्षा मधुन तलवारी, कोयता लोंखडी रॉड लाकडी दांडके घेऊन येउन १० लाख रुपयाची खंडणी मागुन मारहाण करून बळजबरी रिक्षा मध्ये बसवुन अपहरण करुन अभिषेक गंगावणे यांना शिरुर येथील दशक्रिया घाट येथे नेऊन विशाल काळे, उमेश जगदाळे, अविष्कार लांडे अक्षय परदेशी, कैलास ननवरे, देवानंद चव्हाण, हर्बल काळे, रुपेश लुनिया, अमोल लुनिया, दादा खिलारी सर्व (रा. शिरुर) व 2 अनोळखी यांनी त्यांचे गॅगसाठी १० लाख रुपयाची खंडणी मागुन दहशत निर्माण करुन तलवारी, कोयता, लोंखडी रॉड, लाकडी दांडके व हॉकीस्टीक यांनी अभिषेक ईश्वर गंगावणे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करुन जखमी केले होते. त्यांनतर गोपाळ यादव (रा. शिरुर) याने अभिषेक गंगावणे यांना फोन करुन पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याबाबत अभिषेक ईश्वर गंगावणे याने दिलेल्या फिर्यादी वरुन शिरुर पोलिस स्टेशनमध्ये वरील आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचा तपास पोसई विक्रम जाधव करत असताना सदर गुन्हयातील आरोपी नामे अविष्कार संभाजी लांडे (वय २3) रा. सोनार आळी, शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे, अक्षय महेंद्रसिंग परदेशी (वय २३) रा. काचेआळी, शिरूर ता. शिरूर जि. पुणे, कैलास लक्ष्मण ननवरे (वय २३) रा. रामलींग ता. शिरुर जि. पुणे, हर्बल मनोहर काळे (वय २२) रा. ढोरआळी, शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे, अमोल हेमंत लुनिया (वय २७) रा. रामलींग रोड, शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे, अमोल उर्फ दादा अंकुश खिलारे (वय २५) रा. लाटेआळी, शिरुर यांचा शोध घेउन त्यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली असुन त्यांना (दि. २०)रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाले आहे. उर्वरीत आरोपी यांचा शोध घेणेकामी शिरुर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस पथक तयार करण्यात आलेले आहेत.
सदर गुन्हयातील आरोपी पैकी काही आरोपी हे खुनाच्या गुन्हयातुन जामीनावर सुटलेले असुन त्या आरोपींनी वरील प्रमाणे टोळी करुन शिरुर शहरामध्ये दहशत निर्माण करुन लोकाना खंडणीची मागणी करीत असल्याची गोपनिय माहीती पोलिसांना मिळत आहे. याच प्रमाणे वरील आरोपी यांनी आणखी कोणास खंडणी मागीतली असल्यास किंवा खंडणी उकळली असल्यास त्याबाबत शिरुर पोलीस ठाणे येथे तक्रार देण्याचे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे.
वरील कार्यवाही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे, उपविभागीय पोलीस अधिकारीयशवंत गवारी शिरुर यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोसई एकनाथ पाटील, पोसई अभिजीत पवार, पोसई विक्रम जाधव, सहाय्यक फौजदार नजीम पठाण, सहा. फौजदार गणेश देशमाने, पोना. नाथा जगताप, पोना. बाळु भवर, पो. अंमलदार राजेंद्र गोपाळे, विनोद काळे, संतोष सांळुखे प्रविण पिठले, सचिन भोई या पथकाने केली आहे.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…