कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथील यश इन चौकात कत्तलीसाठी जाणाऱ्या 5 जनावरांना वाचविण्यात शिरुर तालुक्यांतील बजरंग दलाच्या गोरक्षकांना यश आले असुन चारचाकी मालवाहू टेम्पोच्या चालकासह दोन जणांवर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गोवंश हत्याबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि 27 मे 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास गोरक्षक विशाल शिंदे हे रांजणगाव वरुन शिरुर कडे येत असताना एक चारचाकी मालवाहतूक टेम्पो क्रं (एम एच 12 जे एफ 2326) ही गाडी गोवंश भरुन शिरुरच्या दिशेने जात असताना त्यांना दिसली. त्यांना संशय आल्याने त्यांनी कोणताही विलंब न करता ही सर्व माहिती त्यांचे सहकारी बजरंग दलाचे जिल्हा सहप्रमुख अजिंक्य तारु यांना सांगितली.
त्यांनी तातडीने रांजणगाव पोलिस स्टेशनला हि बाब कळवत कारेगाव येथील यश इन चौकात सापळा रचून पोलिसांच्या मदतीने हि गाडी पकडली असता यात 1 गावरान गाई आणि 4 वासरे दाटीवाटीने भरलेली दिसली. त्यांनी चालकाकडे अधिक विचारपुस केली असता हि सर्व जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे कळताच गौरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने त्वरीत रांजणगाव पोलिस स्टेशनला हि गाडी जमा केली. तसेच टेम्पो चालकासह दोन जणांवर गोवंश हत्याबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत वाचवलेले 5 गोवंश श्री गौरक्षण पांजरपोळ संस्था,शिरुर येथे सुखरुप सोडण्यात आले.
या कारवाईत बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक अजिंक्य तारु, बजरंग दलाचे गोरक्षक विशाल शिंदे, बजरंग दलाचे रांजणगाव संयोजक रवी जगदाळे, प्रतीक शर्मा, नानासाहेब लांडे, गोरक्षक विशाल पवार, अदित्य सणसे, रविंद्र बैनाडे, लोकेश शर्मा, रोहीत दरडा आदी गोरक्षकांनी भाग घेतला. हि कारवाई यशस्वी करण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी (MIDC) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिरुर तालुक्यातील 33 शाळांचा इयत्ता 10 वीचा शंभर टक्के निकाल
शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…