क्राईम

पुणे-अहमदनगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर बाह्य महामार्गावर पुणे-अहमदनगर रस्त्यावर ऑक्सीगोल्ड टॉकीजचे समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

याबाबत रमेश पांडुरंग चैधरी (वय ६५ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. सतराकमान पुलाजवळ शिरूर यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चालकाविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याचे पुर्वी शिरूर बाह्य पुणे – नगर महामार्गावर ऑक्सीगोल्ड टॉकीजचे समोर पुणे अहमदनगर हायवे रोडवर अहमदनगर बाजुकडे जाणारे लेनवर एक ४५ वर्षीय पुरुषाला अनोळखी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून धडक दिली. अपघात करून त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार प्रताप टेंगले करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

18 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

18 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

18 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

18 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

20 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

20 तास ago