मुंबई: एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा खून केला आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीचा बॅटने मारहाण केली नंतर गळा दाबून खून केला. या घटनेनंतर आरोपी तरुण त्याच्या कुटुंबीयांसह घटनास्थळावरुन फरार झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिसलगढी येथील कॅफे ऑपरेटर गौरवचा विवाह 9 महिन्यांपूर्वी खोडा येथील रहिवासी जयवीर सिंग हिच्यासोबत झाला होता. तो दुसऱ्या मजल्यावर पत्नीसह राहत होता तर तळमजल्यावर 2 भाऊ आणि आई-वडील राहत होते. गौरव व्यसनी असल्याने लग्नानंतर काही महिन्यांपासून दोघांमध्ये हुंड्यावरुन वाद झाला.
मसुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी रवींद चंद पंत यांनी सांगितले की, रविवारी रात्रीही गौरव आणि टीनामध्ये वाद झाला होता. सोमवार (दि. 5) रोजी पहाटे 4 वाजता नशेत असलेल्या गौरवने बेसबॉलच्या बॅटने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा होऊनही घरात उपस्थित असलेल्या एकाही सदस्याने वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. टीना बेशुद्ध पडल्यावर त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि घरातून पळ काढला.
पोलिसांनी गोविंदपुरम येथील उद्यानातून बेशुद्ध अवस्थेत गौरवला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने सांगितले की, त्याचे लग्न 9 महिन्यांपूर्वी डिसेंबर 2021 मध्ये टीनाशी झाले होते. आपल्या धाकट्या भावाची ती खूप काळजी घेत असल्याने टीनाचे आपल्यावर प्रेम नाही असे त्याला वाटले. त्यामुळे दोघांमध्ये काही तरी आहे असा संशय त्याला आला. मात्र, त्याचा कोणताही पुरावा त्याला सापडला नाही.
टीनापासून त्याला वेगळे व्हायचे आहे. त्यासाठी तो 2 दिवसांपूर्वी घरातून पळून जयपूरला गेला होता. कुटुंबीयांनी तेथे पोहोचून रविवारी त्यांना तेथून घरी आणले. तो रात्रीच आला होता. अशी माहिती घरच्या व्यक्तींनी दिली. त्याने दारु प्यायली होती. त्याला वाटले की अशा प्रकारे आपण वेगळे होऊ शकणार नाही, म्हणून त्याने तिला मारण्याचा निर्णय घेतला. पहाटे चार वाजता त्यांचे डोळे उघडले. टीना झोपली होती. त्याला उठवून खोलीचा दरवाजा बंद करुन मारहाण केली.
बेसबॉलच्या बॅटने डोक्यावर हल्ला केला. त्याला वाटले की तिचा श्वास अजून सुरु आहे. त्यानंतर त्याने गळा दाबून तिचा खून केला. घरातील लोकही आले होते पण कोणी काही बोलले नाही. थोड्या वेळाने तो पळून गेला.टीनाच्या हत्येमध्ये वापरलेली बेसबॉल बॅट आणि ओढणी पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पत्नीवर संशय असल्याने त्याने हत्या केल्याचं बोललं जात आहे.
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…
मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…