क्राईम

टेम्पोला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे: बिबवेवाडी परिसरात सोमवारी (ता. २) मध्यरात्री दुचाकीला उभ्या टेम्पोची पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. अक्षय अजित बोथरा (वय ३५, रा. विष्णू कॉम्प्लेक्स, सिंहगड रस्ता) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिस अंमलदार भागीनाथ पवार यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बोथरा हे सोमवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास बिबवेवाडीतून अप्पर इंदिरानगरच्या दिशेने दुचाकीवरून जात होते.

ईएसआयसी रुग्णालयासमोर त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला दुचाकीची पाठीमागून धडक बसली. या अपघातात अक्षय बोथरा खाली पडले असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची नोंद बिबवेवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

13 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

15 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

21 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

1 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 दिवस ago