महाराष्ट्र

जुन्नर तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष पांडुरंग पवार यांचे पक्ष सदस्यत्व रद्द

जुन्नर: जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष पांडुरंग पवार यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पक्ष सध्या शोकाकुल अवस्थेत असताना, पांडुरंग पवार यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या वर्तनामुळे पक्षशिस्तीला तडा गेला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पांडुरंग पवार यांची सून कविता संदीपान पवार या बोरी बुद्रुक–खोडद गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कविता पवार यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे पांडुरंग पवार यांनी आपल्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवून नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने त्यांचा राजीनामा मंजूर करतानाच त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वावरही कारवाई केली आहे.या घडामोडींमुळे जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

12 मिनिटे ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

18 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

21 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

21 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

21 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

21 तास ago