नाशिक: नाशिक जिल्ह्यात पतीपतीने आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या 2 मुलांवरील आईवडिलांचं छत्र हरपलं आहे. आता या कोवळ्या वयातील मुलाचं भविष्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या हृदयद्रावक घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात ही काळीज पिळवटून टाकणारी घडना उघडकीस आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे इथं एका पत्नीने आत्महत्या केली. विहिरीतून उडी टाकून या महिलेनं जीव दिला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पत्नीचा मृतदेह विहिरीतून काढण्याचं काम सुरु होतं. इतक्यात आत्महत्या केलेल्या पत्नीच्या पतीनेही त्याच विहिरीत उडी टाकली आणि आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
काळीज सुन्न करणारी घटना
रुपाली प्रकाश याळिज आणि प्रकाश शंकर याळिज असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. बागलाण तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्हा या घटनेनं हादरुन गेला आहे. रुपाली प्रकाश याळिज यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरु होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. पत्नीशिवाय आता आपण जगून काय करणार? या विवंचनेत असताना पतीनेही त्याच वेळी टोकाचं पाऊल उचललं.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…