नाशिक: नाशिक जिल्ह्यात पतीपतीने आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या 2 मुलांवरील आईवडिलांचं छत्र हरपलं आहे. आता या कोवळ्या वयातील मुलाचं भविष्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या हृदयद्रावक घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात ही काळीज पिळवटून टाकणारी घडना उघडकीस आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे इथं एका पत्नीने आत्महत्या केली. विहिरीतून उडी टाकून या महिलेनं जीव दिला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पत्नीचा मृतदेह विहिरीतून काढण्याचं काम सुरु होतं. इतक्यात आत्महत्या केलेल्या पत्नीच्या पतीनेही त्याच विहिरीत उडी टाकली आणि आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
काळीज सुन्न करणारी घटना
रुपाली प्रकाश याळिज आणि प्रकाश शंकर याळिज असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. बागलाण तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्हा या घटनेनं हादरुन गेला आहे. रुपाली प्रकाश याळिज यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरु होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. पत्नीशिवाय आता आपण जगून काय करणार? या विवंचनेत असताना पतीनेही त्याच वेळी टोकाचं पाऊल उचललं.
शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…
पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…
तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…