शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असताना शिवाजी बाळू शेंडकर व सचिन काळूराम दौंडकर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे पप्पू शेख हे १ फेब्रुवारी रोजी दुचाकीहून जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले असताना दुचाकीहून आलेल्या युवकांनी पप्पू शेख यांना थांबण्याचा इशारा करत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेऊन पळून गेले होते.
याबाबत पप्पू हमीद शेख (वय ५२) रा. महाबळेश्वर नगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिस गुन्ह्याचा तपास करत असताना शिवाजी शेंडकर व सचिन दौंडकर यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, अमोल दांडगे, लखन शिरसकर, अमोल नगले, जयराज देवकर, किशोर शिवणकर, निखील रावडे यांनी दोघा आरोपींचा शोध घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.
दरम्यान पोलिसांनी सदर आरोपींकडून चोरलेली चैन तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करत शिवाजी बाळू शेंडकर (वय २३) रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे व सचिन काळूराम दौंडकर (वय ३३) रा. शेलपिंपळगाव ता. खेड जि. पुणे या दोघांना अटक केली, तर त्यांच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस नाईक अमोल नगले हे करत आहे.
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी…
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल…
लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं…