महाराष्ट्र

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी हा लढा अद्याप संपलेला नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराविरोधातील काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार असून, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

सपकाळ म्हणाले की, नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्यासह संपूर्ण रॅकेटमधील संबंधितांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागावी. या मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा काँग्रेसच्या आंदोलनाचा विजय असला तरी त्यावर समाधान मानण्याचे कारण नसल्याचे सांगत सपकाळ यांनी आरोप केला की, त्यांच्या कार्यकाळात ‘वन नेशन, वन एक्झामिनेशन’च्या नावाखाली परीक्षा व्यवस्थेत गंभीर अनियमितता झाली. पेपरफुटीच्या घटनांमधून काही विशिष्ट वर्गाला आणि भाजपाशी संबंधित लोकांना फायदा करून देण्यात आला तसेच भ्रष्ट मार्गाने आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

नीट परीक्षेसाठी पालकांना करावा लागणारा खर्च केंद्र सरकारच्या अनेक विभागांच्या खर्चापेक्षाही अधिक असल्याचा दावा करत, या रॅकेटची पाळेमुळे खोलवर गेलेली असून संपूर्ण चौकशी होईपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असे सपकाळ म्हणाले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही काँग्रेसचे आंदोलन आणि कँडल मार्च सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

1 तास ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

2 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

2 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

2 तास ago

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय; सचिन सावंत

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय…

2 तास ago

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

22 तास ago