क्राईम

त्या प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर…

मुंबई: मुंबईच्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगावमधील ओबेरॉय संकुलातील इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीने नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. तरुणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील ओबेरॉय संकुलातील ही चौथी आत्महत्येची घटना असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नामांकित विद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये ही तरुणी शिक्षण घेत होती. तिचे वडील मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

तरुणीच्या घरात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोणी नव्हतं. त्यामुळे तरुणीने इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही शेवटच्या चिठ्ठी लिहिली नव्हती.

तरुणीने इमारतीवरून उडी मारल्यानंतर मागील काही दिवसांपासून तिच्यावर अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. तरुणीच्या मृत्यूनंतर परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आरे पोलिसांत अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

मागील सहा महिन्यांत ओबेरॉय संकुलातील विविध इमारतींमधून आतापर्यंत चौघांनी आत्महत्या केली आहे. जुलै महिन्यात अनंत द्विवेदी(२२) या तरुणीने आत्महत्या केली. मे महिन्यात १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. नागरिकांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

13 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

20 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago