मुंबई: इंस्टाग्रामवर मित्रांसोबत चॅट करताना शिवीगाळ केल्याच्या रागातून वडिलांनी मारहाण केल्यानंतर घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणाऱ्या तिघांना अखेर दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणातील तक्रारदार हे चालक असून ते कुटुंबासह गोरेगाव परिसरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा स्थानिक खासगी शाळेत शिक्षण घेतो. ६ डिसेंबर २०२५ रोजी इंस्टाग्रामवर मित्रांसोबत चॅट करताना शिवीगाळ करत असल्याने वडिलांनी त्याला रागाच्या भरात मारहाण केली होती. या घटनेनंतर मुलगा घरातून निघून गेला आणि बराच वेळ होऊनही घरी परतला नाही. त्यामुळे वडिलांनी दिडोंशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात मुलगा घरातून निघून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकात गेल्याचे उघड झाले. तेथे कासिम मुर्शरफअली खान, महेंद्र विष्णू कश्यप आणि संजय राधेश्याम सचेती या तिघांनी त्याला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेले.राजस्थानमध्ये या मुलाला एका मंदिरात महाप्रसाद वाटप करण्याच्या कामावर ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून तीन महिन्यांनंतर मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले.
त्यानंतर मुलाला राजस्थानात नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर बोरिवली येथील स्थानिक न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुलाचा ताबा त्याच्या पालकांकडे देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दिली.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…