क्राईम

अल्पवयीन मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणारे तिघे जेरबंद

मुंबई: इंस्टाग्रामवर मित्रांसोबत चॅट करताना शिवीगाळ केल्याच्या रागातून वडिलांनी मारहाण केल्यानंतर घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणाऱ्या तिघांना अखेर दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणातील तक्रारदार हे चालक असून ते कुटुंबासह गोरेगाव परिसरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा स्थानिक खासगी शाळेत शिक्षण घेतो. ६ डिसेंबर २०२५ रोजी इंस्टाग्रामवर मित्रांसोबत चॅट करताना शिवीगाळ करत असल्याने वडिलांनी त्याला रागाच्या भरात मारहाण केली होती. या घटनेनंतर मुलगा घरातून निघून गेला आणि बराच वेळ होऊनही घरी परतला नाही. त्यामुळे वडिलांनी दिडोंशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात मुलगा घरातून निघून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकात गेल्याचे उघड झाले. तेथे कासिम मुर्शरफअली खान, महेंद्र विष्णू कश्यप आणि संजय राधेश्याम सचेती या तिघांनी त्याला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेले.राजस्थानमध्ये या मुलाला एका मंदिरात महाप्रसाद वाटप करण्याच्या कामावर ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून तीन महिन्यांनंतर मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले.

त्यानंतर मुलाला राजस्थानात नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर बोरिवली येथील स्थानिक न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुलाचा ताबा त्याच्या पालकांकडे देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

3 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

5 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

23 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago