महाराष्ट्र

मोदी पंतप्रधान तोपर्यंत मी मंत्री; रामदास आठवले यांचा मोठा दावा

पुणे: रामदास आठवले यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाबाबत मोठा दावा केला आहे. “मी ज्यांच्यासोबत असतो, ते सत्तेत येतात; आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी मंत्री असेन,” असे वक्तव्य त्यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या आठवले यांनी धुळे येथे झालेल्या सभेत हे विधान केले. राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा होता. धुळेतील महाराणा प्रताप चौकात झालेल्या सभेत त्यांनी आपली लोकप्रियता आणि राजकीय प्रभावावर भाष्य केले. “मी संसदेत बसून चारोळ्या करतो, त्यामुळे जगभरात माझे फॅन तयार झाले आहेत. माझी लोकप्रियता सतत वाढत आहे,” असे ते म्हणाले.

सभेत बोलताना आठवले यांनी आणखी एक दावा केला. “मी ज्यांच्यासोबत असतो त्या पक्षाला १०० टक्के सत्ता मिळते. हा आजवरचा पायंडा आहे आणि त्यात बदल होण्याची शक्यता नाही,” असे त्यांनी सांगितले.

संविधान बदलणार नाही; विरोधकांना संधी नाही

यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत याबाबत खोटे नॅरेटिव्ह तयार केले होते. आता मात्र विरोधकांना केंद्रात सत्तेत येण्याची कोणतीही संधी नाही,” असे आठवले म्हणाले.

तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामकाजाचे कौतुक करत “भारताची परिस्थिती कधीही श्रीलंका, बांगलादेश किंवा नेपाळ सारखी होणार नाही,” असेही सांगितले.

कार्यकर्ता मेळावा

धुळे दौऱ्यादरम्यान आठवले यांनी पक्षाचा कार्यकर्ता मेळावाही घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत “रिपब्लिकन चळवळीची विचारधारा अधिक बळकट करण्याची गरज आहे. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चालत वंचित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी काम करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे सांगितले.या सभेला माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आरपीआय नेते बाबुराव कदम, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

19 मिनिटे ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

22 मिनिटे ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

26 मिनिटे ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

16 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

18 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago