क्राईम

शिरुर तालुक्यात पिसाळलेल्या कोल्हयाचा तीन शेतकऱ्यांवर हल्ला…

शिरुर (अरुणकुमार मोटे): बेट भागात बिबटयाच्या हल्ल्यानंतर आता कोल्हयानेही शेतकऱ्यांवर हल्ला चढवला असून तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आलीआहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील तामखरवाडीचे शेतकरी दशरथ मारुती मुंजाळ (वय ७०) , पूजा विनोद कळकुंबे (वय २५), सुरेश मारुती चोरे (वय ४०) या 3 व्यक्तींवर कोल्हयाकडून वेगवेगळ्या ठिकाणी सोमवारी चार ते पाच च्या दरम्यान हल्ला झाला आहे. हा कोल्हा पिसाळलेला असावा असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

पूजा कळकुंबे ही कांद्याच्या शेतात कांदे काढत असताना अचानक कोल्हयाने पूजा हिच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या वरच्या बाजूला चावा घेतला, तिथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा करताच कोल्ह्याने धूम ठोकली. त्यानंतर काही वेळातच दशरथ मुंजाळ हे शेतात गवत कापत असताना त्यांच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर पुन्हा तासाभरात सुरेश चोरे यांच्या पायाला चावा घेतला. यापैकी दोघांनी टाकळी हाजी येथील खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार घेवून प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे उपचार करून सर्वांना पुढील उपचारासाठी शिरूर येथे पाठविण्यात आले आहे. हे सगळे हल्ले साधारणपणे एक ते दिड किलोमीटर अंतरात झाले आहेत. घटनेची माहिती समजताच माजी सरपंच दामुशेठ घोडे, सरपंच अरूणाताई घोडे, सोसायटीचे संचालक संतोष गावडे यांनी रुग्णालयात जावून रुग्णांची भेट घेतली आहे.

कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी विशेष टास्क फोर्स पाठविण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वतःची,लहान मुलांची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी.

मनोहर म्हसेकर , वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

8 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

9 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

10 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

10 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

10 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

14 तास ago